भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यामध्ये भारताने न्यूझीलंडविरुद्ध (India vs New Zealand) आतापर्यंत 5 आंतरराष्ट्रीय टी20 सामने आणि 3 वनडे सामन्यांची मालिका खेळली आहे. यापैकी टी20 मालिका 5-0ने जिंकून भारताने निर्भेळ यश मिळविले. तर भारताला वनडे मालिकेत मात्र 3-0 अशा फरकाने पराभूत व्हावे लागले.
आता 21 फेब्रुवारीपासून भारत आणि न्यूझीलंड संघात कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेआधी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींनी म्हटले आहे की वनडे मालिकेतील अपयशामुळे भारतीय संघ चिंतित नसून आता ते पुढील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेवर (2 Matches Test Series ) लक्ष देत आहे.
“वनडे मालिकेला सध्या महत्त्व नाही. यावेळी आंतरराष्ट्रीय टी20 मालिका महत्त्वाची आहे. ज्यामध्ये आम्ही 5-0ने विजय मिळविला आहे. त्याचबरोबर पुढील कसोटी मालिकेलाही सध्या महत्त्व आहे. यातील सामने वेलिंग्टन आणि क्राइस्टचर्च (Christchurch) येथे खेळण्यात येणार आहेत,” असे कसोटी मालिकेपूर्वी शास्त्री म्हणाले.
यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये तर पुढीलवर्षी भारतात टी20 विश्वचषक रंगणार आहे. तसेच सध्या कसोटी चॅम्पियनशीपही चालू असल्याने सर्वच संघ सध्या टी20 आणि कसोटी सामन्यांवर अधिक लक्ष देताना दिसत आहेत.
टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना शास्त्री म्हणाले की, “आम्हाला लॉर्ड्समध्ये (कसोटी चॅम्पिटनशीपचा अंतिम सामना) खेळण्यासाठी अद्याप 100 पॉईंट्सची आवश्यकता आहे. जर आम्ही परदेशातील 6 कसोटी सामन्यांपैकी 2 सामने जिंकलो, तर आम्हाला चांगल्या स्थितीत राहता येईल.”
“या वर्षी आम्ही परदेपशात 6 कसोटी सामने खेळणार आहोत. यातील 2 सामने न्यूझीलंडमध्ये आणि उर्वरित 4 सामने ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) खेळवण्यात येणार आहेत. तेव्हा अव्वल क्रमांकाच्या संघाप्रमाणे खेळण्याचा आमचा प्रयत्न असेल.” असे कसोटी सामन्यांबद्दल सांगताना शास्त्री म्हणाले.
भारतीय संघात युवा खेळाडूंच्या आगमनाने शास्त्री यांना आनंद झाला असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. यामध्ये भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) कसोटी संघात पुनरागमन करत आहे. तर शुबमन गिलला (Shubman Gill) कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.
शॉ आणि गिलबद्दल विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना शास्त्री म्हणाले की, “हे दोघेही उत्कृष्ट खेळाडू आहेत. वेलिंग्टन कसोटीमध्ये या दोघांपैकी कोणत्या खेळाडूचा समावेश भारताच्या अंतिम 11 जणांच्या संघामध्ये होईल हे महत्त्वाचे नाही. परंतु हे दोन्ही खेळाडू येथे भारताच्या राष्ट्रीय संघाचा भाग आहेत हे महत्त्वाचे आहे.”
“गिलमध्ये चांगली कामगिरी करण्याची प्रतिभा आहे. तो जेव्हा फलंदाजी करतो तेव्हा त्याची सकारात्मक मानसिकता दिसून येते. 20-21 वर्षीय मुलामध्ये हे पाहून वेगळाच उत्साह निर्माण होतो,” असे गिलची प्रशंसा करताना शास्त्री म्हणाले.
कसोटी मालिकेमध्ये दुखापतग्रस्त रोहित शर्माचा समावेश नसल्यामुळे मयंक अग्रवालसोबत शॉ किंवा गिलला सलामीला फलंदाजी करण्याची संधी मिळू शकते.
“आता सर्वात महत्त्वाचे हे आहे की आपण कशाप्रकारे सामना जिंकू शकतो. नव्या गोष्टींचा वापर आणि काही नव्या युवा खेळाडूंना संधी देण्यासाठी द्विपक्षीय मालिका योग्य असते. तेच आम्ही करत आहोत. संघात सध्या 4-5 खेळाडू 22 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. ते या संधीचा फायदा कशाप्रकारे घेतात, हे त्यांच्यावर अवलंबून आहे,” असेही शास्त्री यावेळी म्हणाले.
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील पहिला कसोटी (1st Test Match) सामना हा शुक्रवारपासून (21 फेब्रुवारी) वेलिंग्टन (Wellington) येथे सुरु होणार आहे.
सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा यांच्यात पुन्हा रंगणार जंगी लढत https://t.co/fkcCmlrttv#म #मराठी #Cricket #TeamIndia @sachin_rt @BrianLara
— Maha Sports (@Maha_Sports) February 14, 2020
न्यूझीलंड विरुद्ध हनुमा विहारीच खणखणीत शतक; गिल, शॉ, रहाणे मात्र अपयशी
वाचा????https://t.co/eE1NapGecR????#म #मराठी #Cricket #TeamIndia #NZvIND— Maha Sports (@Maha_Sports) February 14, 2020