टी२० विश्वचषक २०२१ अगदी जवळ येऊन ठेपला आहे. आयसीसीने ३ ऑक्टोबरपासून या स्पर्धेसाठी तिकिटांची विक्री सुरू केली आहे. स्टेडियम क्षमतेच्या ७० टक्के पर्यंत प्रेक्षक येऊ शकतील. यूएईबद्दल बोलायचे झाल्यास सर्वात कमी किंमतीची तिकिटे ६०० रुपयांना उपलब्ध आहेत. पण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यासाठी चाहत्यांना लाखो रुपये खर्च करावे लागले. सामन्याची तिकिटे ३३३ पट महाग विकली गेली. एव्हढी महाग तिकिटे काही तासांतच विकली गेली.
टी२० विश्वचषक १७ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. भारताचा पहिला सामना २४ ऑक्टोबर रोजी दुबईत पाकिस्तानशी होणार आहे. सर्वात महागड्या तिकिटाची किंमत सुमारे २ लाख रुपये आहे. वेगवेगळ्या स्टॅण्डची किंमत वेगवेगळी असते. प्रारंभिक तिकिटे १२,५०० रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. याशिवाय, ३१,२०० आणि ५४,१०० रुपयामध्ये चाहते प्रीमियम आणि प्लॅटिनम तिकिटे खरेदी करू शकतात. या तीन श्रेणींची तिकिटे जवळजवळ संपली आहेत.
स्काय बॉक्स आणि व्हीआयपी सीट्सच्या किंमती अद्याप अधिकृत वेबसाइटवर दर्शविल्या गेलेल्या नाहीत. म्हणजेच ही तिकिटेही विकली गेली आहेत. पण भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सामन्याच्या व्हीआयपी सीट्सची किंमत १ लाख ९६ हजार रुपये आहे. अशा परिस्थितीत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यांची तिकिटे अधिक महाग होण्याची शक्यता आहे. कारण भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याच्या सर्वात कमी किमतीची तिकिटे १०,४०० रुपयांना उपलब्ध आहेत.
टी२० विश्वचषकाचे हे ७ वे पर्व आहे. एकूण १६ संघ स्पर्धेत उतरत आहेत. ही स्पर्धा शेवटची भारतात २०१६ मध्ये खेळली गेली होती, त्यावेळी वेस्ट इंडिज संघाने विक्रमी दुसऱ्यांदा जेतेपद पटकावले होते. यंदा टी२० विश्वचषकाचा पहिला सामना १७ ऑक्टोबर रोजी मस्कतमध्ये ओमान आणि पापुआ न्यू गिनी यांच्यात खेळला जाईल. त्याच दिवशी बांगलादेश आणि स्कॉटलंडचा सामना होईल.
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याने सुपर -१२ फेरीला २३ ऑक्टोबर रोजी अबू धाबी येथे सुरुवात होणार आहे. भारत २४ ऑक्टोबर रोजी दुबईत पाकिस्तानविरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे.
स्पर्धेदरम्यान, स्टेडियम क्षमतेच्या ७० टक्के पर्यंत प्रेक्षक येऊ शकतील अशी परवानगी देण्यात आली आहे. आयसीसी आणि स्पर्धेचे यजमान बीसीसीआय यांना यूएई सरकारकडून प्रेक्षकांच्या उपस्थितीसाठी हिरवा कंदील मिळाला आहे. स्पर्धेचा अंतिम सामना १४ नोव्हेंबर रोजी दुबईत खेळला जाईल. आधी ही स्पर्धा भारतात होणार होती. पण कोरोनामुळे बीसीसीआयने ही स्पर्धा यूएईमध्ये हलवली होती. पण, स्पर्धेचे आयोजक अजूनही बीसीसीआय आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
हैदराबादविरुद्ध अवघ्या १८ धावा करताच दिनेश कार्तिकच्या नावे झाली ‘या’ मोठ्या विक्रमाची नोंद
Video: मिताली राजला धोनीकडून शिकायचंय हे कौशल्य, दिवस-रात्र कसोटीनंतर व्यक्त केली इच्छा
पुढील आयपीएल हंगामात आरसीबीचा कर्णधार बनणार कोण? माजी भारतीय क्रिकेटरने दिले ‘हे’ उत्तर