टी20 विश्वचषक 2024 चा अंतिम सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना 29 जून रोजी रात्री 8 वाजता केन्सिंग्टन ओव्हल, बार्बाडोस येथे खेळवला जाईल. त्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. रोहित शर्माच्या टीमला हा अंतिम सामना पूर्ण ताकदीने जिंकायचा आहे. कारण टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडचा हा शेवटचा सामना आहे. किंवा आपण असे म्हणू शकतो की मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा हा फेअरवेल सामना आहे.
मागील एक वर्षावर नजर टाकली तर भारतीय संघ आयसीसी स्पर्धेच्या तिन्ही फॉरमॅटच्या अंतिम फेरीत पोहोचण्यात यशस्वी ठरला आहे. ज्यामध्ये आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या अंतिम सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर टीम इंडियाला आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यातही ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. पण यावेळी टी20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात विजयाच्या मोठ्या आशा आहेत.
टी20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यापूर्वी राहुल द्रविड टीम इंडियाचे कौतुक करताना दिसला. जिथे त्याने संघाच्या सततच्या विजयाचे कौतुक केले. द्रविड म्हणाला- “सतत चांगले क्रिकेट खेळणे ही चांगली गोष्ट आहे, असे मला वाटते. गेल्या एका वर्षात तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर 1 असणे आणि अंतिम फेरी गाठणे ही संघासाठी मोठी उपलब्धी आहे. यामुळे खेळाडूंना खूप सन्मान मिळतो. कसोटी, एकदिवसीय आणि टी20, प्रत्येक फॉरमॅटमध्ये आमच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे, ही भारतीय क्रिकेटसाठी अभिमानाची बाब आहे, जर आम्ही चांगले खेळलो आणि थोडे नशीब आमच्या बाजूने असेल तर आम्ही नक्की जिंकू.
Farewell, Rahul Dravid. 🥹❤️
– Thank you for each and every memory, one final time with team India tomorrow. 🇮🇳pic.twitter.com/OezOTUJp64
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 28, 2024
राहुल द्रविड पुढे म्हणाला की, इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनल आणि फायनलमध्ये केवळ एका दिवसाचे अंतर असूनही, भारतीय संघ या सामन्यासाठी सज्ज आहे. तो म्हणाला, “आमच्याकडे तयारीसाठी फक्त एक दिवसाचा वेळ आहे, त्यामुळे सरावाची शक्यता कमी आहे. आता फक्त खेळाडू अंतिम सामन्यासाठी शारीरिक, मानसिक आणि धोरणात्मकदृष्ट्या तयार आहेत याकडे लक्ष द्यायचे आहे. भारत फक्त त्या गोष्टींवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे ज्यावर नियंत्रण ठेवता येते. तो म्हणाला, “या गोष्टींवर आम्ही नियंत्रण ठेवू शकतो.”
महत्तवाच्या बातम्या-
IND vs RSA: चाहत्यांसाठी डोकेदुखी! आयसीसी फायनलमध्ये भारताचा रेकॉर्ड खूपच खराब
क्रिकेट विश्वात खळबळ! फायनलपूर्वी टीम इंडियाचा धक्कादायक निर्णय
रोहित शर्मा उंचावणार टी20 विश्वचषकाची ट्राॅफी, शोएब अख्तरनं केलं मोठं वक्तव्य!