भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली (sourav ganguly) यांनी श्रीलंकेविरुद्ध आगामी काळात खेळल्या जाणाऱ्या मायदेशातील मालिकेविषयी महत्वाची माहिती दिली आहे. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील मालिका २० फ्रेब्रुवारीनंतर संपणार आहे. त्यानंतर फ्रेबुरावीरच्या शेवटच्या आठवड्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी मालिकेची सुरुवात होईल. कसोटी मालिकेतील एक सामना दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दिवस-रात्र कसोटी सामना बेंगलोरमध्ये होणार आहे. स्पोर्टस्टारसोबत बोलताना गांगुली म्हणाले की, “होय, गुलाबी चेंडूचा कसोटी सामना(डे नाईट) बेंगलोरमध्ये होईल. आम्ही अद्याप श्रीलंका मालिकेसाठी सर्व स्थानांविषयी निर्णय घेतलेला नाहीय, पण लवकरच याची गोषणा केली जाईल.”
दरम्यान, श्रीलंकेविरुद्ध खेळला जाणारा हा दिवस-रात्र कसोटी सामना भारतातील आतापर्यंतचा तिसरा दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे. यापूर्वी भारताने २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्ध मायदेशातील पहिली दिवस-रात्र कसोटी खेळली होती. त्यानंतर २०२१ मध्ये भारताने इंग्लंडविरुद्ध मायदेशात दुसरी दिवस-रात्र कसोटी खेळले होती.
दक्षिण अफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत १-२ असा पराभव मिळाल्यानंतर विराट कोहलीने भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. अशात श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताला एक नवीन कसोटी कर्णधार मिळणार आहे. तर विराटसाठी ही मालिका खास ठरणार आहे. विराटने आतापर्यंत ९९ कसोटी सामने खेळले आहेत. पुढच्या सामन्यानंतर तो स्वतःचे १०० कसोटी सामने पूर्ण करेल.
भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी आणि टी-२० मालिकेचे वेळापत्रक
- पहिला कसोटी सामना – २५ फेब्रुवारी ते १ मार्च
- दुसरा कसोटी सामना – ५ मार्च ते ९ मार्च
- पहिला टी-२० सामना – १३ मार्च
- दुसरा टी-२० सामना – १५ मार्च
- तिसरा टी-२० सामना – १९ मार्च
महत्वाच्या बातम्या –
भारत-विंडीज वनडे मालिकेचा मार्ग मोकळा! कर्णधार रोहितसह ‘हे’ खेळाडू सरावासाठी मैदानात
मयंक अगरवाल नसेल पंजाब किंग्जचा नवा संघनायक? फ्रँचायझीचं जरा वेगळंच आहे मत
क्रिकेटर असताना नशिबी आला नाही एकही विश्वचषक, आता लक्ष्मण प्रशिक्षकाच्या रूपात उंचावणार ट्रॉफी?