भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिला सामना बार्बाडोसमध्ये खेळला गेला, जो भारताने 5 विकेट्स राखून नावावर केला. यात सामनावीर ठरला तो कुलदीप यादव. कुलदीपने गोलंदाजी करताना 3 षटकांमध्ये केवळ 6 धावा देऊन 4 विकेट्स घेतल्या. सामना संपल्यानंतर कुलदीपने त्याचा सहकारी युझवेंद्र चहल याच्याविषयी खास प्रतिक्रिया दिली.
सामन्याचा एकंदरीत विचार केली, तर भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिज संघ 23 षटकांत केवळ 114 धावा करत सर्वबाद झाला, तर भारताने 22.5 षटकांत 5 विकेट्सच्या नुकसानावर 118 धावा करत विजय मिळवला. सामना संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना कुलदीप यादव (Kuldeep yadav) युझवेंद्र चहलची आठवण काढली. चहल वेस्ट इंडीजविरुद्धच्या या वनडे मालिकेचा भाग आहे. मात्र, पहिल्या सामन्यासाठी त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये घेतले गेले नाही.
याच पार्श्वभूमीवर कुलदीप यादव म्हणाला की, “जेव्हा तुमच्यासोबत युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) यासारखे वरिष्ठ खेळाडू खेळत असतात, तेव्हा ते खूप चांगले सल्ले देतात. तसेच आमच्या सोबत मुकेश, हार्दिक आणि शार्दुल यांनीही चांगली गोलंदाजी केली. जडेजा आणि मी मिळून चांगली गोलंदाजी केली. मी सध्या माझ्या फॉल्मवर लक्ष देत आहे. योग्य लेंथवर चेंडू टाकत आहे आणि म्हणूनच गोष्टी योग्य पद्धतीने होत आहेत. पहिल्यांदा मला वाटले की वेगवान गोलंदाजांसाठी हे मैदान स्वर्गच आहे. पण आम्ही आनंदी आहोत आमच्याकडून (जडेजा आणि कुलदीप) संघाला 7 विकेट्स मिळाल्या. या खेळपट्टीवर चेंडूला स्पिनसोबत बाऊंस देखील मिळत होता.”
वेस्ट इंडिज पहिली फलंदाजी करताना कोणत्याही खेळाडूने अपेक्षित फलंदाजी केली नाही. वेस्ट इंडिजच्या सगळ्याच खेळाडूंची फलंदाजी निराशाजनक होती, एकही फलंदाज अर्धशतक करू शकला नाही. वेस्ट इंडिजचा कर्णधार शाय होप (Shai Hope) याच्या सर्वाधिक 43 धावा होत्या. कुलदीप आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांच्या 7 विकेट्स सोबत हार्दिक पांड्या (Hardik pandya), शार्दुल ठाकुर (Shardul Thakur), आणि मुकेश कुमार ( Mukesh kumar) यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. प्रत्युत्तरात भारतीय संघासाठी सलामीला आलेला यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन याने 46 चेंडूत 52 धावांची सर्वोत्तम खेळी केली.
महत्वाच्या बातम्या:
नाद नाद नादच! देवधर ट्रॉफीत रियान परागचं वादळी शतक, 11 सिक्स मारत टीकाकारांची बोलती केली बंद
हुश्श! आता स्टेडिअममध्ये ‘या’ गोष्टीसाठी प्रेक्षकांच्या खिशाला बसणार नाही फटका, बीसीसीआयने उचलेले मोठे पाऊल