---Advertisement---

ऑलिम्पिक सुरु होण्यापूर्वीच स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना ‘किंग’ कोहलीनं दिल्या शुभेच्छा…!

On: सोमवार, जुलै 15, 2024 8:30 PM
Virat Kohli (4)
---Advertisement---

भारताचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीनं (Virat Kohli) देशवासीयांना ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वी भारताच्या प्रोत्साहनासाठी आवाहन केलं. तो म्हणाला की, 26 जुलैपासून पॅरिसमध्ये सुरू होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी सर्व खेळाडूंना पाठिंबा द्या. सोशल मीडियावरील एका मिनिटाच्या व्हिडिओमध्ये कोहली म्हणाला की, आता भारताला क्रीडा महासत्ता म्हणून ओळखण्याची वेळ आली आहे. या व्हिडिओमध्ये ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पदकाच्या अपेक्षेचा समावेश आहे.

कोहली म्हणाला, “अशी एक वेळ होती जेव्हा जग भारताला हत्तींचा देश म्हणून ओळखत होतं. परंतू, आता तसं नाही. आता आम्ही जगातील सर्वात मोठे लोकशाही आणि माहिती तंत्रज्ञानाचे केंद्र आहोत. आम्ही क्रिकेट आणि बॉलिवूडसाठी तसंच वेगवान वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांनी ओळखले जात आहोत. आता या महान देशासाठी पुढील मोठी गोष्ट काय असेल तर जेव्हा आम्ही अधिकाधिक सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदक जिंकले पाहिजेत.”

पुढे बोलताना विराट कोहली (Virat Kohli) म्हणाला, “आमचे भाऊ बहीण पॅरिसला पदक जिंकण्यासाठी जात आहेत. जेव्हा ते ट्रॅक आणि फील्ड, कोर्ट किंवा रिंगमध्ये प्रवेश करतील, तेव्हा एक अब्जाहून अधिक भारतीय त्यांच्याकडे लक्ष देतील. भारताचा आवाज प्रत्येक रस्त्यावर घूमेल. माझ्याबरोबर, आपण त्यांचे चेहरे देखील लक्षात ठेवले पाहिजेत जे तिरंगा अभिमानाने फडकवतील. जय हिंद आणि भारताला शुभेच्छा.”

महत्त्वाच्या बातम्या-

रिंकू सिंहबाबत बॅटिंग कोचची मोठी भविष्यवाणी; म्हणाले, “त्याला कसोटीत संधी मिळाली तर…”
बीसीसीआयचे होणार कोट्यवधींचे नुकसान? ‘या’ कामांवर बंदी आणू शकते भारत सरकार
हार्दिक पांड्याचं जोरदार स्वागत…रस्त्यावर गर्दी मावेना! वडोदऱ्यात भव्य रोड शोचं आयोजन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---