येते काही महिने क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी२० विश्वचषक २०२२ खेळला जाणार आहे. तत्पूर्वी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात युएईत आशिया चषक २०२२ होणार आहे. टी२० स्वरूपात ही स्पर्धा खेळली जाणार आहे. २७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत भारतीय संघावर सर्वांच्या नजरा असतील. कारण भारतीय संघ आशिया चषकाचा सर्वात यशस्वी संघ राहिला असून यंदाही ते विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असतील.
तत्पूर्वी आशिया चषकात (Asia Cup 2022) किती भारतीय खेळाडूंनी संघाचे नेतृत्त्व केले आहे?, कोणाच्या नेतृत्त्वाखाली भारताने किती वेळा आशिया चषक (Asia Cup) उंचावला आहे?, यांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ…
१९८४ साली आशिया चषक स्पर्धेला सुरुवात झाली होती. तेव्हापासून २०१८ पर्यंत ही स्पर्धा १३ वेळा झाली आहे. २०२२मध्ये ही स्पर्धा युएईमध्ये होणार आहे. ७वेळा भारतीय संघाने ही स्पर्धा आजपर्यंत जिंकली आहे. ही स्पर्धा सुरु झाल्यापासून केवळ २०१६साली टी२० प्रकारात खेळवली गेली आहे. त्यानंतर दुसऱ्यांदाच म्हणजे यावर्षी ही स्पर्धा टी२० प्रकारात खेळवली जाणार आहे. २०२३मध्ये ही स्पर्धा पाकिस्तानात होणार असून ती वनडे प्रकारात खेळवली जाणार असल्याचे बोलले जातेय.
सर्वप्रथम आशिया चषकाच्या पहिल्यावहिल्या हंगामात अर्थात १९८४मध्ये सुनिल गावसकर (Indian Leaders In Asia Cup) यांनी भारतीय संघाच्या नेतृत्त्वाची धुरा सांभाळली होती. त्यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने पहिल्यांदाच होत असलेला आशिया चषक जिंकण्याचा पराक्रम केला होता. गावसकरांनंतर १९८८मध्ये दिलीप वेंगरसकर यांनी भारतीय संघाचे नेतृत्त्व केले होते. तर १९९१ व १९९५ अशा दोन स्पर्धेत मोहम्मद अझरुद्दीनने संघाचे नेतृत्त्व केले होते. भारताला या तिन्ही हंगामात विजेतेपद मिळाले होते.
तर मास्टर ब्लास्टरने एका स्पर्धेत अर्थात १९९७ साली भारतीय संघाचे नेतृत्त्व केले. २००० व २००४साली सौरव गांगुलीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ आशिया चषक स्पर्धा खेळला होता. परंतु भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक राहिलेल्या सचिन आणि गांगुलीला कर्णधार म्हणून आशिया चषकात विजय मिळवता आला नव्हता. पुढे २००८, २०१० व २०१२ अशा सलग तीन स्पर्धांत एमएस धोनी भारतीय संघाचा कर्णधार होता. टी२० विश्वचषक २००७ जिंकून देणाऱ्या धोनीने यापैकी २०१० मध्ये विजेतेपद मिळवले होते. त्यानंतर २०१६मध्येही त्याने संघाचे नेतृत्त्व केले होते आणि आशिया चषकही जिंकून दिला होता.
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याच्या नेतृत्त्वात भारताने फक्त एक वेळा ही स्पर्धा खेळली होती. २०१४मध्ये कोहलीने भारतीय संघाचे नेतृत्त्व केले होते, ज्यात विजेतेपद मिळवण्यात संघाला अपयश आले होते. मात्र कोहलीमागून येत रोहितने आशिया चषक जिंकण्याचा पराक्रम केला. २०२२मध्ये आशिया चषकात भारतीय संघाचे नेतृत्त्व करणाऱ्या रोहितने यापुर्वी २०१८मध्ये या स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्त्व केले होते. या हंगामात भारत विरुद्ध बांगलादेश संघांनी दमदार प्रदर्शन करत अंतिम सामन्यात धडक मारली होती. भारतीय संघाने ३ विकेट्सने अंतिम सामना जिंकत विक्रमी सातव्यांदा आशिया चषक उंचावला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
बुमराह आशिया चषकातून बाहेर, तरीही टीम इंडियाला नाही चिंता! ‘हा’ खेळाडू आहे कारण
अरे, नक्की चाललंय तरी काय! एशिया कपसाठी आवेश इन, शमी आउट; फॅन्स भडकले निवडकर्त्यांवर
नशीबचं फुटके! चांगल्या प्रदर्शनानंतरही आशिया चषकातून बाहेर झाले ‘हे’ ५ भारतीय क्रिकेटर