भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्ध विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना 18 ते 22 जूनदरम्यान इंग्लंडमध्ये खेळणार आहे. याबद्दल दोन्ही संघाच्या माजी खेळाडूंनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. याचदरम्यान भारतीय संघाचे माजी गोलंदाज अजित अगरकर यांनी विराट सेनेला एक सल्ला दिला आहे.
अगरकर यांनी स्टार स्पोर्ट्सला सोमवारी मुलाखत दिली. ते म्हणाले की, ‘मला आशा आहे की भारतीय संघाने न्यूझीलंड संघाला कमी समजले नाही तरच चांगले आहे. त्यांना कमजोर समजले तर ती भारताची चूक होईल.’ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना 18-22 जूनला साउथम्प्टनमध्ये एजेस बाउल मैदानावर होणार आहे.
अगरकर पुढे म्हणाले की, ‘जर तुम्ही आयसीसीच्या स्पर्धा पाहिल्या तर समजेल, जरी हr आयसीसीचा पहिली कसोटी अजिंक्यपद स्पर्धा असली, तरी टी-20 विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी किंवा वनडे विश्वचषक असो त्यामध्ये न्यूझीलंड संघ नेहमी उपांत्यपूर्व, उपांत्य फेरी किंवा अंतिम सामन्यात सहभागी होताना दिसला आहे. न्यूझीलंड संघाने मागील काही काळात खूप बदल केले आहेत.’
अगरकर यांना वाटते की, भारताने न्यूझीलंडला कमी समजू नये. भारताला उत्कृष्ट कामगिरी करायची नितांत गरज आहे. त्यासाठी कष्ट हे घ्यावेच लागणार आहेत. संघातील प्रत्येक खेळाडूंना आपले योगदान द्यावेच लागणार आहे.
आगरकरांची कामगिरी
अजित आगरकर हे भारतचे माजी खेळाडू असून त्यांनी अनेक प्रकारे भारतासाठी योगदान दिले आहे. आगरकरानी तिन्ही स्थरावर 200हून अधिक सामने भारताकडून खेळले आहेत. त्यांनी 1 एप्रिल 1998 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोची येथे एकदिवसीय सामन्यातून पदार्पण केले होते. त्या सामन्यात त्यांनी अॅडम गिलक्रिस्टची विकेट घेतली होती. पदार्पणानंतर लगेच २० वर्षीय आगरकर यांनी न्यूझीलंडविरुद्धच्या महत्त्वपूर्ण कोकाकोला चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात पहिला सामनावीर पुरस्कार जिंकला.
पण इरफान पठाणच्या आगमनानंतर त्यांच्या स्थानासाठी स्पर्धा सुरू झाली. आगरकर 2007 पर्यंत भारतीय संघाचा एक महत्त्वाचा भाग होते.
ऑस्ट्रेलियात 1999 च्या कसोटी मालिकेत आगरकर यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. कसोटीत सामने जिंकण्यासाठी त्यांनी महत्वाचे योगदान दिले आहे. आगरकर यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये देखील चांगली कामगिरी केली आहे.
आगरकर यांनी 26 कसोटी, 191 वनडे सामने आणि 4 टी20 सामने खेळले. त्याचा 2007 च्या पहिल्या टी20 विश्वविजेत्या भारतीय संघातही समावेश होता. त्यांनी एकूण 221 सामने खेळताना 31.09 च्या सरासरीने 349 विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
खुलासा! धावांचा रतीब घालणाऱ्या रोहितने ‘या’ खेळाडूच्या बॅटने झळकावले होते पहिले अर्धशतक
भारताच्या प्रारंभीच्या काळातील चपळ विकेटकीपर, ऑस्ट्रेलिया दौरा गाजवत कमावले होते नाव