---Advertisement---

जर असं झालं, तर भारत घडवेल चमत्कार, मँचेस्टरमध्ये बेजबॉलच्या घमंडाला बसेल मोठा धक्का!

On: रविवार, जुलै 27, 2025 5:32 PM
---Advertisement---

ओल्ड ट्रॅफर्ड येथे भारत आणि इंग्लंडमध्ये (IND vs ENG) सुरू असलेल्या चौथ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताने 2 खेळाडूंच्या मोबदल्यात 174 धावा केल्या आहेत. के.एल. (KL Rahul) राहुल (90) धावा करून बाद झाला आहे आणि शुबमन गिल (100) नाबाद असून भारत अजूनही इंग्लंडच्या 108 धावांनी मागे आहे.

NDTV चे सल्लागार संपादक बोरिया मजूमदार यांच्या मते, सामना वाचवायचा असेल तर भारतासाठी पाचव्या दिवशीची सुरुवात अत्यंत महत्त्वाची असेल. विशेष म्हणजे नवीन चेंडूवरचे पहिले 20 षटकं सामन्याचं वळण ठरवतील. कारण खेळपट्टीवर बाऊन्स आहे, काही चेंडू खाली राहू शकतात.

ते असंही म्हणाले की, के.एल. राहुल आणि शुबमन गिलने 5 तास टिकून अप्रतिम भागीदारी केली, जी कुणीही अपेक्षित केली नव्हती. त्यामुळे आता लोकांना सामना जिंकण्याचीही आशा वाटत आहे.

पंतदेखील (Rishbh Pant) फलंदाजीला येणार असल्यामुळे भारताच्या आशा वाढल्या आहेत. मात्र, सामना जिंकणं खूप कठीण आहे. भारताने अजूनही 400+ धावा कराव्या लागतील आणि पुन्हा इंग्लंडला फलंदाजी करावी लागेल. पण सामना ड्रॉ करणे शक्य आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---