भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvSA) पहिला टी20 सामना बुधवारी (28 सप्टेंबर) तिरूअनंतपुरम येथे खेळला गेला. या पहिल्याच सामन्यात जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार या अनुभवी वेगवान गोलंदाजांच्या अनुपस्थितीत अर्शदीप सिंग याने त्याची जबाबदारी उत्तमरित्या निभावली. सामन्यातील दुसरे व वैयक्तिक पहिले षटक टाकताना त्याने दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी सलामीवीर क्विंटन डी कॉक, रायली रुसो आणि डेव्हिड मिलर या तीनही अनुभवी फलंदाजांना बाद केले. त्याच्या या जबरदस्त गोलंदाजीने रहस्य त्यानेच सांगितले आहे.
दक्षिण आफ्रिका नाणेफेक गमावत पहिली फलंदाजी करायला उतरली. तीन महत्वाच्या विकेट्स गमावल्यावर विरोधी संघ त्यातून सावरलाच नाही. यामुळे ते केवळ 8 विकेट्स गमावत 106 धावसंख्या उभारू शकली. तर भारताने हे लक्ष्य 16.4 षटकात 2 विकेट्स गमावत पार केले.
अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) याने पहिल्या टी20नंतर गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे यांच्यासोबत बीसीसीआय टीव्हीवर चर्चा केली. यामध्ये त्याने त्याच्या गोलंदाजीचे कौशल्य सांगितले आहे. यावेळी त्याला म्हाम्ब्रे यांनी विचारले की मालिकेआधी ब्रेक मिळाल्यानंतर त्या वेळेचा कसा सदुपयोग केला आणि कशी पूर्वतयारी केली? यावर अर्शदीप उत्तर देताना म्हणाला, “मी फिटनेस आणि मजबुतीवर अधिक काम केले. त्यामुळे मला चांगला फायदा झाला. याचे श्रेय तुम्हालाच जाते, कारण हा प्लॅन तुमचाच होता.”
म्हाम्ब्रे यांनी पुढे अर्शदीपला विचारले, “सामन्याआधी खेळपट्टी पाहिली होती का. त्यावर गोलंदाजी कशी करायची याबाबत डोक्यात कोणता विचार होता?” या प्रश्नांची उत्तरे देताना अर्शदीप म्हणाला, “मी खेळपट्टी सहसा पाहत नाही. मी गोलंदाजी प्रशिक्षकाकडे जातो आणि त्यांना विचारतो येथे नेमके काय करावे लागेल. मी तुम्हाला विचारले होते, तेव्हा तुम्ही म्हणाला होता की, येथे नवीन चेंडू स्विंग होईल. नाणेफेक जिंकली हे आमच्यासाठी चांगले झाले. दीपकभाईने चांगली सुरूवात केली.”
Coming back after a short break, @arshdeepsinghh shone bright in the first #INDvSA T20I. ???? ????
Do Not Miss as he discusses it all with Bowling Coach Paras Mhambrey post #TeamIndia's win in Thiruvananthapuram. ???? ???? – By @RajalArora
Full interview ???? ????https://t.co/DG6572akLB pic.twitter.com/7eMjmc8zb6
— BCCI (@BCCI) September 29, 2022
अर्शदीपने 4 षटकात 32 धावा देत तीन विकेट्स घेतल्या. या तिन्ही विकेट्स त्याने त्याच्या पहिल्याच षटकात आणि सामन्याच्या दुसऱ्याच षटकात घेतल्या. याच कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केएल राहुलची स्लो खेळी ठरली ऐतिहासिक, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला एकमेव भारतीय
भव्य फुटबॉल महोत्सवासाठी भारत सज्ज, फिफा अंडर-17 वुमन्स वर्ल्ड कप इंडिया -2022 स्पर्धा 11 ऑक्टोबरपासून
‘काही गोष्टी कधीच बदलत नाहीत!’, रैनाच्या वर्ल्ड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमधील कॅचची होत आहे चर्चा