क्रिकेटमध्ये फलंदाज, गोलंदाज आणि कर्णधाराइतकेच पंचांचेही तितकेच महत्त्व असते. मात्र दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या आयपीएल २०२२मधील ३४व्या सामन्यात दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत याने पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेतला. हे प्रकरण चांगलेच तापले असून आता राजस्थान संघाचे प्रशिक्षक कुमार संगकारा (Kumar Sangakkara) यांनी या प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
संगकारा यांचे असे म्हणणे आहे की, पंच खेळावर नियंत्रण ठेवण्याचे काम करतात. ते काय मान्य आहे आणि काय नाही? हे ते सांगू शकत नाहीत.
पत्रकार परिषदेत बोलताना संगकारा (Kumar Sangakkara On Umpire’s Decision) म्हणाले की, “माझ्या मते पंच खेळाला नियंत्रित करतात. आयपीएलमध्ये खूप दबाव असतो. जेव्हा तुमची अशा प्रकारची स्थिती होते, तेव्हा गोष्टी कोणत्याही बाजूने घडू शकतात. पण शेवटी पंचच स्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे काम करतात आणि खेळ पुढे चालू राहातो. दिल्लीविरुद्धच्या सामन्यावेळी मैदानावर जे काही घडले, ते स्विकाहार्य होते की नाही? हे मी नाही सांगू शकत.”
दिल्लीच्या डावातील विवादीत शेवटचे षटक
विजयासाठी शेवटच्या षटकात दिल्लीला ३६ धावांची आवश्यकता होती. राजस्थानचा ओबेद मॅककॉय गोलंदाजीसाठी आला, तर स्ट्राईकवर फलंदाजीसाठी रोवमन पॉवेल होता. षटकातील सुरुवातीचे तिन्ही चेंडूवर पॉवेलने षटकार ठोकले आणि संघाला विजयाची आशा निर्माण झाली. यादरम्यान मॅककॉयने टाकलेल्या तिसऱ्या चेंडूमुळे हा वाद झाला. त्याने हा चेंडू फुलटॉस घेकला होता आणि तो नो बॉल असू शकत होता. परंतु पंचाने त्याला नो बॉल करार दिला नाही. याच कारणास्तव कर्णधार रिषभ पंत (Rishabh Pant) चांगलाच संतापला आणि त्याने खेळपट्टीवरील त्यांच्या फलंदाजांना मैदान सोडण्याचा इशारा देखील दिला.
दिल्लीच्या (Delhi Capitals) डग आऊटमधून नो बॉलची मागणी केली जात होती, पण पंचांनी तिसऱ्या पंचाकडे विचारणा न करता निर्णय दिला. त्यावेळी जोस बटलर सीमारेषेच्या जवळ क्षेत्ररक्षणासाठी उभा होता आणि त्याने पंतला समजवण्याचा प्रयत्न केला. तसेच, दिल्लीचा प्रशिक्षक शेन वॉटसनने देखील पंतला समज दिली. त्यानंतर संघाचे प्रशिक्षक प्रवीण आमरे मैदानात धावत गेले आणि त्यांचा संघ खेळण्यासाठी तयार असल्याचे सांगितले. पॉवेल सुरुवातीला चांगल्या फॉर्ममध्ये होता, पण या वादानंतरच्या तीन चेंडूवर त्याला कमाल करता आली नाही. शेवटच्या तीन चेंडूवर त्याने अवघ्या २ धावा केल्या. परिणामी दिल्लीला १५ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आंद्रे रसेलची अष्टपैलू कामगिरी व्यर्थ, गुजरातचा शेवटच्या षटकात रोमांचक विजय
बटलर आहे कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये, आवडच्या स्टेडियमवर सलामीवीराने केला खुलासा