---Advertisement---

गुजरातच्या विजयानंतर कॅप्टन गिलचं मोठं वक्तव्य; म्हणाला…

On: गुरूवार, एप्रिल 10, 2025 8:54 AM
---Advertisement---

9 एप्रिल रोजी आयपीएल २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध विजय नोंदवल्यानंतर, गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने त्याच्या संघातील खेळाडूंचे कौतुक केले. गुजरातने शानदार कामगिरी करत राजस्थानला 58 धावांनी पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना, साई सुदर्शनच्या 82 धावांच्या जोरावर जीटीने 217/6 धावा केल्या. यानंतर जीटी गोलंदाजांनीही चमकदार कामगिरी केली. या सामन्यात राजस्थान संघ 19.2 षटकांत 158 धावा करून सर्वबाद झाला.

या हंगामात गुजरात टायटन्सचा हा सलग चौथा विजय आहे. राजस्थानला हरवल्यानंतर कर्णधार शुभमन गिल म्हणाला, प्रथम फलंदाजी करताना त्यांनी चांगली धावसंख्या उभारली, पहिल्या 3-4 षटकांत धावा करणे सोपे नव्हते. साई आणि बटलरने ज्या पद्धतीने फलंदाजी केली ती अद्भुत होती. त्याचा संघ कोणत्याही दिवशी 220 धावा करू शकतो आणि त्यानंतर त्याचे वेगवान गोलंदाज सामना संपवण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी करतात.

संघात अनेक सामनावीर खेळाडू असल्याबद्दल कर्णधार म्हणाला, “सामनावीर निवडायला अडचण येते, ही आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. कारण आमच्याकडे असा संघ आहे, जिथे प्रत्येक जण योगदान देतोय. मी खूप आनंदी आहे. आणि रशीदसारखे गोलंदाज संघात असताना, कर्णधाराचं काम खूप सोपं होतं.”

या सामन्यात 82 धावांची शानदार खेळी केल्याबद्दल साई सुदर्शनला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. POTM पुरस्कार मिळाल्यानंतर सुदर्शन म्हणाला की आयपीएल ही एक अशी स्पर्धा आहे ज्यामध्ये त्याला सुरुवातीपासूनच लय आवश्यक आहे. संघाच्या विजयात योगदान देणे त्याच्यासाठी नेहमीच आनंददायी असते. त्याला त्याचा डाव शेवटपर्यंत खेळवायचा होता. तो नेहमीच संघासाठी काय चांगले करू शकतो हे पाहण्याचा प्रयत्न करतो, त्याची जाणीव आणि कौशल्ये सुधारण्याचा प्रयत्न करतो.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---