शुक्रवारी लखनई सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सचा 12 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना लखनऊ सुपर जायंट्सने 20 षटकांत 8 गडी गमावून 203 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, मुंबई इंडियन्स संघाची सुरुवात खराब झाली. संघाने तीन षटकांत दोन विकेट गमावल्या. यानंतर, नमन आणि सूर्यकुमार यांनी डावाची जबाबदारी घेतली. नमन बाद झाल्यानंतर, सूर्यकुमारने तिलकसह मुंबईचा धावसंख्या 150च्या पुढे नेला. या दरम्यान तिलक वर्मा संथ खेळी करताना दिसला आणि त्यामुळे 19व्या षटकात, मुंबई संघाकडून तिलक वर्माला निवृत्त होण्याचा संदेश आला. तथापि, अनेक माजी क्रिकेटपटूंनी हा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे.
मुंबई इंडियन्सच्या डावात तिलक वर्माने 23 चेंडूत 25 धावा केल्या. त्याने त्याच्या डावात दोन चौकार मारले. सूर्यकुमार यादव बाद झाल्यानंतर तिलक वर्मा मोठे फटके मारू शकला नाही, त्यामुळे हार्दिक पांड्यावर दबाव वाढत होता. 19व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर तिलक वर्मा रिटायर हर्ट झाला आणि पॅव्हेलियनमध्ये परतला, हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. तिलकच्या जागी मुंबईने मिचेल सँटनरला क्रीजवर आणले. मात्र, मुंबईच्या या निर्णयावर माजी क्रिकेटपटूंनी जोरदार टीका केली आहे. संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयामुळे सूर्यकुमार यादवही निराश दिसत होता आणि त्याने या विषयावर प्रशिक्षक महेला जयवर्धने यांच्याशीही चर्चा केली.
सामन्याच्या 19व्या षटकात मुंबई संघाने तिलक वर्माला रिटायर करण्याचा निर्णय घेतला पण त्याचा संघाला फायदा झाला नाही. तिलकने 23 चेंडूत 25 धावा केल्या. 19व्या षटकातील पहिल्या पाच चेंडूत शार्दुलने फक्त पाच धावा दिल्या, त्यानंतर मुंबई संघाने तिलक वर्माला रिटायर करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या जागी आलेल्या सँटनरने दोन धावा काढून आपले खाते उघडले.
शेवटच्या षटकात मुंबईला 22 धावांची आवश्यकता होती आणि हार्दिकने आवेशविरुद्ध षटकार मारून उत्साह वाढवला पण आवेशने शेवटच्या पाच चेंडूंमध्ये हार्दिकला हात उघडण्याची संधी दिली नाही आणि लखनऊला 12 धावांनी विजय मिळवून दिला. हार्दिकने शेवटच्या षटकात स्ट्राईकही रोटेट केला नाही, त्यामुळे तिलकला रिटायर आउट करण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
Hardik Pandya said, "it was obvious we needed some hits and Tilak Varma was not getting. It was one of those days for him when it wasn't really working". pic.twitter.com/V3Qoa9P2aB
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 4, 2025
सामन्यानंतर तिलकच्या निवृत्तीबाबत हार्दिक पांड्याने आपलं मत व्यक्त केलं. तो म्हणाला, “कधीकधी संघाला जोरदार फटके मारणारा फलंदाज हवा असतो. पण क्रिकेटमध्ये असे क्षण येतात, जेव्हा तुमच्या बॅटमधून तशी खेळी होत नाही. अशावेळी मी एक गोष्ट लक्षात ठेवतो. साधं राहा आणि चांगलं क्रिकेट खेळा. मला गोष्टी गुंतागुंतीच्या न करता सरळ ठेवायला आवडतं, आणि जेव्हा गरज असते, तेव्हा योग्य निर्णय घेणं मला महत्त्वाचं वाटतं.”