---Advertisement---

IPL 2026 प्लेऑफचे समीकरण: उर्वरित तीन जागांसाठी पंजाब, राजस्थान यांच्यासोबत कोलकाता-दिल्लीमध्ये चुरस! वाचा सविस्तर

On: सोमवार, मे 18, 2026 1:02 PM
---Advertisement---

आयपीएल २०२६ मध्ये आपल्या पहिल्या सात सामन्यांमध्ये अपराजित राहणारा पंजाब किंग्ज आता प्लेऑफसाठी पात्र ठरणार की नाही, याची चिंता त्यांच्या चाहत्यांनी लागली आहे. या हंगामात आतापर्यंत ६२ सामने खेळले गेले आणि केवळ एक संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. दोन संघ आधीच स्पर्धेबाहेर झाल्याने उर्वरित तीन जागांसाठी सात संघांची धडपड सुरू आहे.

या सात संघांपैकी केवळ चार संघांच्या प्लेऑफच्या समीकरणाबाबत पाहू. आयपीएल २०२६ च्या ६२ व्या सामन्यानंतर उरलेले तीन संघ – सनरायझर्स हैद्राबाद, गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांना प्लेऑफसाठी पात्र होण्यासाठी त्यांना स्वत: च निर्णय घ्यावे लागतील. याचे कारण असे की त्यांना आपले बाकी राहिलेले सामने जिंकण्याची आवश्यकता आहे, इतर संघावर अवलंबून राहण्याची गरज नाही. तसेच इतर चार संघांची प्लेऑफसाठी पात्र होण्याची शंका आहे.

पंजाब किंग्ज – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धचा सामना (१७ मे) गमावल्यानंतर पंजाब गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे. त्यांचे १३ सामन्यांतून ०.२२७ च्या नेट रनरेटसह १३ गुण आहेत. त्यांचा शेवटचा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध आहे आणि हा सामना जिंकला तर त्यांचे केवळ १५ गुण होतील. त्यामुळे श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाची चौथ्यांदा प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता कमी दिसते.

राजस्थान रॉयल्स – राजस्थानने १२ सामने खेळताना सहा जिंकले आणि तेवढेच गमावले आहेत. यामुळे त्यांचे १२ गुण झाले असून नेट रनरेट ०.०२७ आहे. ते गुणतालिकेत सहाव्या स्थानी आहेत. त्यांना प्लेऑफसाठी पात्र होण्यास त्यांच्या उर्वरित दोन सामन्यांमध्ये मोठा विजय आवश्यक आहे आणि असे झाले तर त्यांचे १६ गुण होती. तसेच त्यांना ही पण काळजी घ्यावी लागेल चेन्नई (१२ गुण) आणि हैद्राबाद (१४ गुण) यांनी एकच सामना जिंकला, तरच राजस्थानसाठी काही संधी आहेत.

दिल्ली कॅपिटल्स – सध्या गुणतालिकेत सातव्या स्थानी असलेल्या दिल्लीचे १३ सामन्यांमधून १२ गुण झाले आहेत. त्यांनी गट फेरीतील आपला शेवटचा सामना जिंकल्यानंतरही त्यांचे केवळ १४ गुण होतील, यामुळे त्यांचे प्लेऑफमध्ये पोहोचण्याचे भवितव्य एका चमत्कारावर अवलंबून आहे.

कोलकाता नाईट रायडर्स – केकेआर गुणतालिकेत आठव्या स्थानी आहेत. त्यांनी १२ पैकी ५ सामने जिंकले असून सहा सामने गमावले आहेत. त्यांचा एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. यामुळे त्यांचे ११ गुण आहेत. आता त्यांचे केवळ दोनच सामने बाकी असून त्यांनी ते जिंकले तरीही त्यांचे १५ गुण होतील. यामुळे त्यांना प्लेऑफसाठी पात्र होण्यास इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे. त्यासाठी पुढील निकाल लागले पाहिजे, हैद्राबादने त्यांचे दोन्ही सामने आणि पंजाबने एक सामना गमावला तर केकेआरसाठी काही संधी आहेत. तसेच त्यांना एक मोठा विजयही आवश्यक आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---