मुंबई । भारत सरकारने चीनला चांगलाच झटका दिला आहे. चीनने गलवान घाटीमध्ये आक्रमण केल्यानंतर भारताने चीनच्या 59 ऍपवर बंदी घातली आहे. आता किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे मालक नेस वाडिया हे देखील आयपीएलमध्ये चिनी प्रायोजकांशी नाते तोडण्याच्या विचारात आहे.
गलवान घाटीमध्ये 15 जून रोजी चीनी सैनिक आणि भारतीय लष्करातील जवानांमध्ये संघर्ष झाला होता. यामध्ये भारतीय जवानांनी चीनच्या 40 सैनिकांचा खात्मा केला. परंतु यामध्ये भारताचेही 20 जवान हुतात्मा झाले. त्यानंतर भारतात चिनी उत्पादनांवर बहिष्कार करण्याची मागणीने जोर धरला. आता आयपीएलमध्येही विवो कंपनीशी करण्यात आलेल्या करारावर देखील विचार केला जाऊ शकतो.
पंजाब संघाचे मालक नेस वाडिया पीटीआयशी बोलताना म्हणाले की, “आयपीएलमध्ये चिनी प्रायोजकांशी नाते तोडणे गरजेचे आहे. आमच्यासाठी देश प्रथम आणि पैसानंतर. ही इंडियन प्रीमियर लीग आहे चीन प्रीमियर लीग नाही. चिनी कंपनीशी नाते तोडून एक उदाहरण समोर ठेवले पाहिजे आणि त्यांना रस्ता दाखवला पाहिजे.”
“सुरुवातीला प्रायोजक शोधण्यात थोडे अवघड होईल. मला वाटते की, भारतात अनेक मोठ्या कंपनी आहेत. जी त्यांची जागा घेऊ शकते. आपल्याला देश आणि सरकारचा आदर केला पाहिजे. स्वतःचा जीव धोक्यात घालून देशाची सेवा करणाऱ्या सैनिकांचाही आम्हाला आदर आहे,” असे नेस वाडिया यांनी सांगितले.
चीनमधील मोबाइल कंपनी विवो आयपीएल मधील महत्त्वपूर्ण प्रायोजक आहे. दरवर्षी ही कंपनी भारतीय क्रिकेट बोर्डाला 440 कोटी रुपये देते. त्यांचा 2022 पर्यंत करार आहे. केवळ आयपीएलच नव्हे तर अन्य खेळातही चिनी कंपन्यांनी करार केला आहे.
तसेच चेन्नई सुपरकिंग्सासह अन्य संघानेही सरकारच्या नियमांचे पालन करणार असल्याचे सांगितले. आयपीएलशी संबंधित पेटीएम, स्विगी आणि ड्रीम इलेव्हनमध्ये चीनी कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे.
ट्रेंडिंग घडामोडी –
हैद्राबादचे कर्णधारपद व न्यूझीलंडचे कर्णधारपद सांभाळण्यात काय आहे फरक? विलियमसन म्हणतो…
टिकटॉकवर आली बंदी आणि ऑस्ट्रेलियाच्या वॉर्नरचे झाले मोठे नुकसान, आश्विननेही घेतली मजा
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानचं स्पेलिंगच लिहीलं चुकिच, मग काय सोशल मीडियावर…