---Advertisement---

कधीच नाही लाभलं नेतृत्व करण्याचं भाग्य, पण लिजेंड्स लीगमध्ये ‘या’ दोन भारतीयांच्या वाट्याला कर्णधारपद

Team India 2007
---Advertisement---

आगामी लिजेंड्स लीग क्रिकेट (एलएलसी) ही स्पर्धा भारतात पहिल्यांदाच खेळली जात आहे. यामध्ये चार संघामध्ये 16 सामने खेळले जाणार आहेत. या लीगचे सामने भारतामध्ये सहा शहरांत खेळल्या जाणार आहेत. तर यातील पहिला सामना 16 सप्टेंबरला इडन गार्डन, कोलकाता येथे खेळला जाणार आहे. यासाठी चार संघांच्या कर्णधारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये हरभजन सिंग आणि इरफान पठाण हे कर्णधाराच्या रूपात दिसणार आहेत.

लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये भारताचे हरभजन सिंग (Harbhajan Singh) आणि इरफान पठाण (Irfan Pathan) यांनी सहभाग घेतला असून दोघेही संघाचे नेतृत्व करणार आहेत. हरभजन सिंग मणिपाल टायगर्स संघाचा कर्णधार आहे, तर इरफान पठाण भिलवाडा किंग्ज संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहेत.

कर्णधार झाल्यावर इरफान पठाण याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने म्हटले, “आपण जे करत आहोत त्याचा आनंद घ्यायला पाहिजे आणि आपले 100 टक्के योगदान दिले पाहिजे. ही माझ्यासाठी वेगळ्या प्रकारची संधी आहे. मला पूर्ण विश्वास आहे की आम्ही एक संघ म्हणून चांगली कामगिरी करू”

हरभजन सिंग यानेही कर्णधार झाल्यानंतर आपले विचार व्यक्त केले आहेत. त्याने म्हटले, “मी खूप काळापासून महान खेळाडूंसोबत क्रिकेट खेळले आहेत. यामुळेच मला एक चांगला क्रिकेटपटू बनता आले. एक क्रिकेटपटू म्हणून मला कधीही नेतृत्व करण्याची संधी मिळाली नाही. पण आता मला ती संधी मिळाली आहे आणि त्यासाठी मी खूप उत्सुक आहे. माझ्यावर विश्वास दाखविला आहे त्यामुळे मी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार आहे.”

https://twitter.com/llct20/status/1565616177526689793?s=20&t=gecL8qOHKgGSSHs4LJKzBA

हरभजन हा 400 विकेट्स घेणारा पहिला भारतीय फिरकीपटू ठरला. त्याने भारताकडून 28 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. तर पठाण हा 2007च्या टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सामनावीर ठरला होता. या दोघांनी कधीही भारतीय संघाचे कोणत्याच क्रिकेटच्या प्रकारामध्ये नेतृत्व केले नाही.

त्याचबरोबर विरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांनाही या लीगमध्ये कर्णधार करण्यात आले आहे. सेहवाग अदाणी ग्रुपचा गुजरात जायंट्स संघाचे नेतृत्व करणार आहे. तर त्याचा संघसाथी गंभीर इंडिया कॅपिटल्सचे नेतृत्व करणार आहे.

ही लीग लखनऊ, दिल्ली, कटक आणि जोधपूर येथे खेळली जाणार आहे. तर प्ले ऑफ आणि अंतिम सामन्यांचे ठिकाण सध्यातरी अनिश्चित आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘बाऊंड्री लाईनवर उडता कायरन पाहिलात का?’ पोलार्डने घेतलेला अप्रतिम झेल एकदा बघाच
टीम इंडियालाही बरोबरीची टक्कर देणाऱ्या हाँगकाँगला घाबरले पाकिस्तान! दिग्गजाने दिली वॉर्निंग
ब्रेकिंग! टी20 विश्वचषकासाठी इंग्लंडचा संघ जाहीर, बटलरकडे कॅप्टन्सी; तर ‘हा’ स्टार क्रिकेटर बाहेर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---