मुंबई इंडियन्स संघाचा उपकर्णधार व अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने मंगळवारी (१७ मे) सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आपल्या टी२० कारकिर्दीतील एक मैलाचा दगड पार केला. बुमराहने आपल्या टी२० कारकिर्दीतील २५० बळी या सामन्यात पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा तो पहिला आणि एकमेव भारतीय बनला. (Bumrah 250 T20 Wickets)
बुमराहची उत्कृष्ट गोलंदाजी
या सामन्यात प्रथम गोलंदाजी करताना मुंबईसाठी जसप्रीत बुमराहने आपल्या चार षटकात ३२ धावा देऊन एक बळी मिळविला. यासह त्याने टी२० क्रिकेटमध्ये आपले २५० पूर्ण केले. त्याने आत्तापर्यंत २०६ टी२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याची इकॉनॉमी ७.४ अशी मामुली राहीली. तर एवरेज २१ चे राहिले. फक्त आयपीएलचा विचार केला तर बुमराहने मुंबईसाठी ११९ मॅचमध्ये १४२ बळी मिळवले आहेत. त्याच्यापुढे केवळ हरभजन सिंग याचा क्रमांक लागतो. त्याने १५० बळी मिळवले होते. मात्र, आता तो निवृत्त झाला आहे.
त्याच्या पाठोपाठ भुवनेश्वर कुमार याचा क्रमांक लागतो. त्याने आत्तापर्यंत २२३ टी२० बळी मिळवलेत. तिसऱ्या स्थानी असलेल्या जयदेव उनाडकतनेही बळींचे द्विशतक पूर्ण केले आहे. त्यानंतर विनय कुमार व इरफान पठाण यांचा क्रमांक लागतो. त्यांनी अनुक्रमे १८९ व १७३ बळी मिळवले होते.
चालू हंगामात खराब कामगिरी
मुंबई इंडियन्स संघासाठी आयपीएलचा हा हंगाम निराशाजनक राहिला आहे. पाच वेळा आयपीएल जिंकलेल्या मुंबईला यावेळी स्पर्धेतून सर्वात पहिल्यांदा बाहेर व्हावे लागले. स्वतः जसप्रीत बुमराह यांची कामगिरी देखील म्हणावी तशी झाली नाही. एक सामना सोडल्यास तो आपला प्रभाव पाडण्यात अयशस्वी झाला. त्याने १३ सामन्यात फक्त १२ बळी मिळवले. त्याच्या व्यतिरिक्त कोणता गोलंदाज १० बळी मिळवू शकला नाही.
महत्वाच्या बातम्या-
जिल्हा अजिंक्यपद फुटबॉल: यजमान नाशिकला हरवून पुणे अंतिम फेरीत (mahasports.in)
‘कुंबळे हटाओ पंजाब बचाओ’; आयपीएलमधून बाहेर झाल्यावर चाहत्यांनी सुरू केली मागणी (mahasports.in)