भारतीय संघाने श्रीलंका संघाविरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात यजमान श्रीलंका संघाचा ७ गडी राखून धुव्वा उडविला आहे. या विजयासह भारतीय संघाने ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडू इंग्लंडमध्ये असल्यामुळे श्रीलंका दौऱ्यावर युवा खेळाडूंचा संघ रवाना करण्यात आला आहे. अशातच संघाचे नेतृत्व शिखर धवनच्या हाती देण्यात आले आहे, तर संघाचे मुख्य प्रशिक्षकपद राहुल द्रविड यांना देण्यात आले आहे. या विजयानंतर, नेटकऱ्यांनी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना सोशल मीडियावर ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
करण जोहरनी हार्दिक पंड्याला शोवर बोलावण्याची केली नसती हिंमत
राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली युवा खेळाडूंनी नटलेल्या भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध जोरदार विजय मिळवल्यानंतर राहुल द्रविड आणि संघाचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. अभिनेता आणि हास्यकलाकार रहमान खान यांनी ट्विट करत म्हटले की, “राहुल द्रविड हे श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघाचे प्रशिक्षक आहेत. हार्दिक पंड्यासाठी रवी शास्त्री पासून ते राहुल द्रविड यांच्यापर्यंतचा बदल जरा कठीण आहे. राहुल द्रविड जर भारतीय संघाचे प्रशिक्षक असते, तर करण जोहरने पंड्याला ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये आमंत्रित करण्याची हिंमत केलीच नसती.”(Karan Johar would not dared to call hardik Pandya in koffee with karan if rahul Dravid would have been coach for india)
Rahul Dravid coach for Sri Lanka tour It's a difficult transition for Hardik Pandya from Ravi shastri to Rahul Dravid. If Rahul Dravid would have been coach for India karan johar wouldn't have dared to call Pandya on koffee with karan#INDvsSL
— Rehman Khan (@rehmanology) July 18, 2021
काय घडले होते कॉफी विथ करण’ शोमध्ये?
झाले असे होते की, २०१९ सालामध्ये हार्दिक पंड्या आणि केएल राहुल हे दोघेही कॉफी विथ करण’ शोमध्ये पाहुणे म्हणून गेले होते. या शोमध्ये हार्दिक पंड्याने महीलांबद्दल अभद्र टीका केली होती. त्याने केलेल्या वक्तव्यामुळे चाहत्यांनी त्याला भरपूर ट्रोल केले होते. हे प्रकरण खूप चर्चेत आले होते. तसेच बीसीसीआयने हार्दिक पंड्या आणि केएल राहुल यांच्यावर काही सामन्यांसाठी निर्बंध देखील लावले होते.
पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाचा जोरदार विजय
या सामन्यात श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटक अखेर ९ बाद २६२ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने ३६.४ षटकात ७ राखून हा सामना आपल्या नावावर केला. यासह ३ वनडे सामन्याच्या मालिकेत १-० ने आघाडी देखील घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
वाढदिवस विशेष: विश्वचषक १९८३ स्पर्धेतील दुर्लक्षित नायक, ज्याने कैफ, युवराजलाही दिले होते प्रशिक्षण
सामना जिंकला पाकिस्ताननं, अन् सेलिब्रेशन ‘युनिव्हर्स बॉस’ ख्रिस गेलचं; एकदा पाहाच हा भन्नाट व्हिडिओ
धवनच्या नेतृत्त्वाखाली ‘कुलचा’ जोडीने दाखवला दम, सांगितली त्यांची सर्वात मोठी ताकद