भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात 5 सामन्यांची टी-20 मालिका सुरू आहे. मालिकेचा चौथा सामना क्वीन्सलँडमधील कॅरारा ओव्हल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. आतापर्यंत झालेल्या 3 सामन्यांमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांनी प्रत्येकी एक-एक विजय मिळवला आहे, तर पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. या चौथ्या सामन्यात जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) इतिहास रचण्याची संधी मिळवू शकतो, आणि तो असं करणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरेल.
बुमराह फक्त 2 विकेट घेताच मोठा पराक्रम करू शकतो. सध्या त्याने 78 टी-20 सामन्यांत 98 विकेट घेतल्या आहेत. चौथ्या सामन्यात जर त्याने आणखी 2 विकेट घेतल्या, तर तो भारतासाठी टी-20 मध्ये 100 विकेट घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज बनेल. यासोबतच तो भारताच्या इतिहासातला पहिला गोलंदाज ठरेल, ज्याने तिन्ही प्रकारांमध्ये (कसोटी, वनडे आणि टी-20) 100 किंवा त्याहून अधिक विकेट घेतल्या आहेत. आजपर्यंत कोणत्याही भारतीय गोलंदाजाने तिन्ही फॉरमॅटमध्ये 100+ विकेट घेतल्या नाहीत. जर बुमराहने हे साध्य केले, तर तो हा दुर्मिळ विक्रम करणारा पहिला भारतीय ठरेल.
बुमराहने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या टी-20 मालिकेत फारशी चमक दाखवलेली नाही. 3 सामन्यांत त्याने फक्त 2 विकेट घेतल्या आहेत. दुसऱ्या सामन्यात 2 विकेट आणि तिसऱ्या सामन्यात एकही नाही.
तसेच, चौथ्या सामन्यात त्याच्याकडे पाकिस्तानच्या सईद अजमलचा विक्रम मोडण्याचीही संधी आहे.
बुमराह सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मध्ये 17 सामन्यांत 19 विकेट घेऊन खेळतो आहे. फक्त एक विकेट घेताच तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनेल.






