क्रिकेटच्या अनेक सामन्यांमध्ये पंचांच्या खराब निर्णयामुळे पंच आणि खेळाडू यांच्यात अनेक विवाद निर्माण झाले आहेत. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२ हे पण यातून वाचू शकले नाही. बुधवारी (२५ मे) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि लखनऊ सुपर जायंट्स या एलिमिनेटर सामन्यातही पंचांच्या निर्णयावर खेळाडूंनी आक्षेप घेतला.
कोलकाताच्या इडन गार्डन स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात बेंगलोरने लखनऊला १४ धावांनी पराभूत करत दुसऱ्या क्वालिफायरमध्ये प्रवेश केला. तत्पूर्वी सामन्यादरम्यान बेंगलोरची फलंदाजी सुरू असताना लखनऊचा कर्णधार केएल राहूल आणि कृणाल पांड्या हे पंचांशी वाद घालताना दिसले. याचे त्या दोघांना गंभीर परिणाम भोगावे लागतील याची दाट शक्यता आहे.
बेंगलोरची फलंदाजी सुरू असताना १२व्या षटकात गोलंदाज दुष्मंथा चामिराच्या पहिल्या चेंडूला पंचानी नो-बॉल ठरवत फ्रि हीट दिली. कमरेच्यावर, फुल-टॉस असणाऱ्या या चेंडूला स्क्वेयर लेगवर उभे असलेल्या मायकल गॉफने नो-बॉल देण्याचा निर्णय घेतला. तर नॉन-स्ट्राईकवर असलेल्या जयरामन मदनगोपाल या दुसऱ्या पंचांनी नो-बॉलचा इशारा केला. यावरून राहूल आणि पांड्या यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
तो चेंडू नो-बॉलसाठी योग्य होता. तसेच हा निर्णय गॉफ यांचा आहे हे मदनगोपाल खेळाडूंना समाजावून सांगत होते. महणून राहूल आणि पांड्या हे गॉफकडे गेले आणि हा निर्णय तिसऱ्या पंचाकडे नाही पाठवू शकत का? अशी विचारणा ते करत होते. डगआऊटमध्ये उभे असलेले लखनऊचे प्रशिक्षक ऍण्डी फ्लॉवर हे पण या निर्णयावरून निराश दिसत होते. पण या फ्रि हीटचा बेंगलोरने फायदा उचलला नाही. त्यांचा फलंदाज महिपाल लोमरोर याने या फ्रि हीटवर एकही धाव घेतला नाही.
https://twitter.com/Smash_Jaiswal/status/1529489220468936706?s=20&t=6BMrMENpJi1KlWOxfy8Tug
पंचांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उभे राहणे हे काही या आयपीएल हंगामात प्रथमच घडले असे नाही. याआधी २२ एप्रिलला झालेल्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल या सामन्यात असेच घडले होते.
राजस्थान विरुद्ध दिल्ली या साखळी सामन्यातही दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत आणि गोलंदाज शार्दूल ठाकूर यांनीही पंचांशी वाद घातल्याने त्यांना दंड झाला होता. पंतची १०० टक्के आणि शार्दूलची ५० टक्के सामना फी कापण्यात आली होती. तर त्यांचे सहाय्यक प्रशिक्षक प्रविण आमरे यांच्यावर एक सामन्याचा प्रतिबंद घातला होता.
दिल्लीला सामना जिंकण्यासाठी शेवटच्या षटकात ३६ धावांची गरज होती. २०व्या षटकात ओबेड मॅकॉच्या गोलंदाजीवर रोवमन पॉवेलने पहिल्या तीन चेंडूत षटकार मारले. नंतरच्या शेवटच्या चेंडूवर पॉवेल यष्टीरक्षक संजू सॅमसनला झेल देत बाद झाला. कमरेच्यावर, फुल-टॉस असणाऱ्या या चेंडूला नो-बॉल न दिल्याने पंतने नाराजी दर्शवली होती. जर हा चेंडू नो-बॉल दिला असता तर सामन्याचे चित्र वेगळेच दिसले असते. हा सामना राजस्थानने १५ धावांनी जिंकला.
दिल्ली संघाबाबत जो निर्णय आयपीएलच्या समितीने घेतला तसेच काहीसे राहूल आणि पांड्या यांच्या विषयीही होऊ शकते.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अनसोल्ड खेळाडू ते मॅच विनर, लखनऊविरुद्ध शतक ठोकणारा आरसीबीचा रजत पाटीदार; वाचा त्याच्याबद्दल
‘मी आयुष्यात अशी खेळी पाहिली नाही’, शतकवीर पाटीदारचं कर्णधाराकडून कौतुक; ‘या’ खेळाडूचीही स्तुती