भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये येत्या काही दिवसात कसोटी मलिकेचा थरार रंगणार आहे. ४ ऑगस्टपासून ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना नॉटिंगहॅममध्ये खेळला जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ कसून सराव करताना दिसून येत आहे. तसेच गेल्या काही महिन्यांपासून संघात स्थान मिळवण्यात अपयशी ठरलेला फलंदाज केएल राहुल या मालिकेत मध्यक्रमात फलंदाजी करताना करू शकतो. ही मालिका सुरू होण्यापूर्वी त्याने दिलेल्या एका मुलाखतीत, त्याला पुनरागमन करण्यासाठी कुठल्या अडचणींचा सामना करावा लागला याचा खुलासा केला आहे.
केएल राहुलने बीसीसीआय टीव्हीसोबत चर्चा करताना म्हटले की, “मी माझ्या उणीवा दूर करण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. जेव्हा मला २०१८ मध्ये संघांबाहेर करण्यात आले होते. तेव्हा मी पुन्हा जाऊन माझ्या प्रशिक्षकांशी चर्चा केली होती. माझ्या चुका जाणून घेण्यासाठी खूप व्हिडिओ देखील पाहिले होते.”
केएल राहुलने कसोटी क्रिकेटमध्ये आपले शेवटचे शतक २०१८ मध्ये इंग्लंड संघाविरुद्ध झळकावले होते. त्यानंतर पुढील १२ डावात त्याला अवघ्या १९५ धावा करण्यात यश आले आहे.
तसेच तो पुढे म्हणाला, “मला आनंद आहे की, कसोटी क्रिकेटमधून बाहेर झाल्यानंतर मला मदत मिळाली. जसं की म्हटलं जातं अपयश ही यशाची पहिली पायरी असते. मीही येणाऱ्या संधीची वाट पाहत आहे. तसेच स्वतःला शांत आणि संयमी बनवण्याचा प्रयत्न करत आहे.” त्याने गेल्या हंगामात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २ सामने खेळले आहेत. तसेच नुकत्याच पार पडलेल्या भारत विरुद्ध सिलेक्ट काउंटी इलेव्हेन यांच्यातील सराव सामन्यात त्याने शतकी खेळी केली होती.” (Kl rahul explained how he made his comeback in test team)
माझ्यासाठी ही उत्तम संधी
केएल राहुल पुढे म्हणाला, “मी कधीच आत्मविश्वासाची चिंता केली नाही. डोकं शांत ठेवलं आणि होणाऱ्या चुकांमधून शिकत राहिलो. मला फक्त खेळाचा आनंद घ्यायचा आहे. मी चुका केल्या आहेत आणि त्यातून मला भरपूर काही शिकायला मिळालं आहे. आता माझ्याकडे उत्तम संधी आहे, भारतीय संघासाठी काहीतरी चांगलं करण्याची.”
महत्त्वाच्या बातम्या-
गोलंदाजी करताना पोलार्डने केलं असं काही; ऑसी फलंदाज म्हणाला असेल, ‘हुश्श, थोडक्यात वाचलो’!
‘नेहमी मोठ्या भावाच्या चरणात’, म्हणत रणवीर सिंगने केला माहीसोबतचा फोटो शेअर; जिंकली लाखो मने