भारताने आशिया कप 2025 मध्ये युएईचा 9 विकेट्सने पराभव करून शानदार सुरुवात केली आहे. बुधवारी आशिया कपचा दुसरा सामना भारताने संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध 93 चेंडू शिल्लक असताना जिंकला, जो आशिया कप टी20 मध्ये शिल्लक असलेल्या चेंडूंच्या बाबतीत सर्वात मोठा विजय आहे. या सामन्यात स्टार स्पिनर कुलदीप यादवने शानदार कामगिरी केली. त्याने 2.1 षटकात सात धावा देत चार विकेट्स घेतल्या. कुलदीपने त्याच्या एका षटकात तीन विकेट्स घेतल्या. उत्कृष्ट कामगिरीसाठी कुलदीपला सामनावीर म्हणूनही निवडण्यात आले. यासोबतच कुलदीप यादवने एक मोठी कामगिरीही केली.
कुलदीप यादवने 13 चेंडूत चार विकेट्स घेतल्या, जो आशिया कपमधील एक नवीन विक्रम आहे. कुलदीपने टी20 आशिया कपच्या इतिहासातील दुसरी सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी केली आणि या स्पर्धेत चार विकेट्स घेणारा सर्वात जलद गोलंदाजही ठरला. भारताचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने पाकिस्तानच्या शादाब खानचा विक्रम मोडला. 2022च्या आशिया कपमध्ये हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात शादाबने 17 चेंडूत 4 बळी घेतले.
कुलदीप यादवला युएईविरुद्धच्या डावात 7वे षटक टाकण्याची संधी मिळाली. त्याने पहिल्या षटकात चार धावा दिल्या. त्यानंतर पुढच्या षटकात त्याने तीन धावा देत तीन बळी घेतले, ज्यामध्ये त्याने राहुल चोप्रा, कर्णधार मुहम्मद वसीम आणि हर्षित यांचे बळी घेतले. तिसऱ्या षटकात कुलदीपने हैदर अलीला येताच पहिल्याच चेंडूवर बाद करून युएईचा डाव संपवला. आशाप्रकारे त्याने चार बळी घेतले. युएई संघ 13.1 षटकात फक्त 57 धावा करू शकला.
इंग्लंडमध्ये सलग पाच कसोटी सामन्यांमध्ये कुलदीपची प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड झाली नव्हती. परंतु त्याने कुशलतेने गोलंदाजी केली आणि 2.1 षटकात सात धावा देत चार बळी घेतले.






