आयपीएल 2020चा हंगाम जवळ आला आहे. आयपीएलचा हा 13वा हंगाम (2020 IPL13th Season) असणार आहे. या हंगामापूर्वी बीसीसीआयने आयपीएलमध्ये बदल करण्याचे ठरवले आहे.
किंग्स इलेव्हन पंजाबचे सहमालक नेस वाडिया यांनी बीसीसीआयला प्रस्ताव पाठवला आहे. 2020पासून प्रत्येक आयपीएल सामन्यापूर्वी राष्ट्रगीत म्हटले पाहिजे. आता चालू घडीला आंतरराष्ट्रीय सामन्यांपूर्वी राष्ट्रगीत म्हटलं जाते,असे या प्रस्तावात म्हटले आहे.
“जगातील अव्वल क्रमांकाच्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत या नियमाच पालन केलं गेलं पाहिजे,” असे वाडिया यावेळी म्हणाले.
त्याचबरोबर, आयपीएलच्या उद्घाटन समारंभावेळी खर्च कमी करण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयाला वाडिया यांनी पाठिंबा दिला आहे.
“ही एक उत्तम सुरुवात आहे. आम्ही कोणताही उद्घाटन समारंभ करणार नाही. मी नेहमीच उद्घाटनाऐवजी इतर महत्त्वाच्या गोष्टींबद्दल विचार केला आहे. बीसीसीआयने आयपीएलच्या सामन्यांपूर्वी राष्ट्रगीत हे अनिवार्य केलं गेलं पाहिजे. मी बीसीसीआयला या संबंधित पूर्वीच प्रस्ताव पाठवला होता. तसेच, मी सौरव गांगुलीलाही याबद्दल पत्र लिहिले आहे,” असे वाडिया म्हणाले.
“राष्ट्रगीत हे इंडियन सुपर लीग (फुटबाॅल) (Idian Super League) आणि प्रो कबड्डी लीगमध्ये (Pro Kabaddi League) या स्पर्धांमध्ये म्हटले जात आहे. ही इंडियन प्रीमियर लीग आहे. आपल्याला याबद्दल अभिमान वाटला पाहिजे.’
‘आपल्याकडे उत्कृष्ट राष्ट्रगीत आणि आयपीएल सारखी लीग आहे. तसेच नॅशनल बास्केटबाॅल असोसिएशनच्या (NBA) सामन्यापूर्वीही राष्ट्रगीत म्हटले जाते,” असेही वाडिया म्हणाले.
बीसीसीआयने आयपीेएलच्या उद्घाटन समारंभ न करण्याचा निर्णय घेतला आहे. समारंभावर खर्च करण्यात येणारी रक्कम चांगल्या कामासाठी खर्च केली जाईल,” असे बीसीसीआयने सांगितले आहे.
2019च्या आयपीएलचा उद्घाटन सोहळा पुलवामा हल्ल्यामुळे रद्द करण्यात आला होता. या सोहळ्याची रक्कम सैनिकांना देण्यात आली होती.
https://twitter.com/Maha_Sports/status/1193074702597545984
https://twitter.com/Maha_Sports/status/1192771491948969986