2007 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात पहिला टी20 आंतरराष्ट्रीय सामना खेळवण्यात आला होता, जो 2007 च्या टी20 विश्वचषकाचा लीग सामना होता. या सामन्यात मोहम्मद आसिफ सामनावीर होता. सामना बरोबरीत सुटला आणि भारताने बॉल-आउटद्वारे विजय मिळवला. तेव्हापासून, भारताने पाकिस्तानविरुद्ध 11 सामने जिंकले आहेत आणि त्या प्रत्येक सामन्यात एक भारतीय खेळाडू सामनावीर ठरला आहे. इरफान पठाण हा पुरस्कार जिंकणारा पहिला खेळाडू होता. 2007 च्या टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात तो पाकिस्तानविरुद्ध भारताचा सामनावीर होता.
2012 मध्ये विराट कोहलीने हा पुरस्कार जिंकला आणि त्याच वर्षी युवराज सिंगनेही पाकिस्तानविरुद्ध सामनावीराचा पुरस्कार जिंकला. 2014 च्या टी20 विश्वचषकात अमित मिश्रा भारताचा सामनावीर होता. 2016 मध्ये, विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध दोनदा, एकदा टी20 आशिया कपमध्ये आणि एकदा टी20 विश्वचषकात हा पुरस्कार जिंकला. 2022 च्या आशिया कपमध्ये, हार्दिक पांड्याने भारतासाठी सामनावीराचा पुरस्कार जिंकला.
तर 2022 मध्येच, विराटने मेलबर्नमध्ये झालेल्या टी-20 विश्वचषक सामन्यात सामनावीराचा पुरस्कार जिंकला. 2012 , 2016(2) आणि 2022 मध्ये विराटने पाकिस्तानविरुद्ध एकूण चार सामनावीराचा पुरस्कार जिंकला. 2024 च्या टी-20 विश्वचषकात जसप्रीत बुमराहने सामनावीराचा पुरस्कार जिंकला आणि 2025च्या आशिया कपच्या साखळी सामन्यात कुलदीप यादव हिरो होता. आता, अभिषेक शर्माने त्याच्या दमदार फलंदाजीमुळे सुपर 4 सामन्यात हा पुरस्कार जिंकला. पाकिस्तानसाठी, मोहम्मद आसिफ (2007) नंतर मोहम्मद हाफीज (2012), बाबर आझम (2021) आणि मोहम्मद नवाज (2022) यांचा क्रमांक लागतो.
टी20 मध्ये पाकिस्तान विरुद्ध भारतासाठी सामनावीर पुरस्कार
इरफान पठान (2007)
विराट कोहली (2012)
युवराज सिंग (2012)
अमित मिश्रा (2014)
विराट कोहली (2016)
विराट कोहली (2016)
हार्दिक पांड्या (2022)
विराट कोहली (2022)
जसप्रीत बुमराह (2024)
कुलदीप यादव (2025)
अभिषेक शर्मा (2025)*






