मुंबई इंडियन्सने आयपीएल 2025 मधील सलग दुसरा सामना गमावला. एकेकाळी असे वाटत होते की मुंबईचा संघ हा सामना जिंकेल, कारण 197 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना मुंबई इंडियन्सने 10 षटकांत सुमारे 100 धावा केल्या होत्या. यानंतर, मुंबईचे नशीब कसे बदलले याची पाच कारणे जाणून घ्या. मुंबई इंडियन्सच्या पराभवासाठी रोहित शर्मापासून ते कर्णधार हार्दिक पांड्यापर्यंत अनेक खेळाडू जबाबदार आहेत.
1 सलामी जोडी फ्लाॅप
गेल्या सामन्यात खाते उघडू न शकलेला सलामीवीर रोहित शर्मा या सामन्यातील चौथ्या चेंडूवर बाद झाला. त्याचा साथीदार रायन रिकेलटनही फार काही करू शकला नाही. मुंबईने फक्त 25 धावांत दोन विकेट गमावल्या. मुंबईच्या पराभवाचे हे मुख्य कारण होते.
2. पांड्याची फलंदाजी अपयशी ठरली.
या सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्याची फलंदाजी ताकद दाखवू शकली नाही. तो 17 चेंडूत फक्त 11 धावा काढून बाद झाला. तो सामने जिंकवण्यासाठी ओळखला जातो, पण यावेळी त्याचा स्ट्राइक रेट देखील 70 पेक्षा कमी होता.
3. इम्पॅक्ट प्लेअर अपयशी ठरतो
या सामन्यात, मुंबई इंडियन्सने रॉबिन मिंजला प्रभावशाली (इमप्कॅट) खेळाडू म्हणून खेळवले, परंतु तो प्रभाव पाडू शकला नाही. 6 चेंडूत 3 धावा काढल्यानंतर तो साई किशोरचा बळी ठरला. गेल्या सामन्यातही तो स्वस्तात बाद झाला होता.
4. मुजीब-राजू यांनी धावा दिल्या
मुंबई इंडियन्सकडून गोलंदाजी करताना मुजीब उर रहमानने निराशा केली. अहमदाबादची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी थोडीशी उपयुक्त मानली जाते, परंतु मुजीबने 2 षटकांत 28 धावा दिल्या. सत्यनारायण राजूने 3 षटकांत 40 धावा दिल्या.
5. विघ्नेशला संधी देण्यात आली नाही
एमआयच्या पराभवाचे आणखी एक कारण म्हणजे गेल्या सामन्याचा हिरो, मिस्ट्री फिरकी गोलंदाज विघ्नेश पुथूर, या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये नव्हता. त्याने चेन्नईमध्ये 3 विकेट्स घेतल्या, पण त्याचे नाव येथे प्लेइंग इलेव्हनमध्ये नव्हते.