टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतग्रस्त आहे. तो सध्या रिहाब करतोय, ज्यासाठी आणखी काही काळ लागू शकतो. येत्या नोव्हेंबर-जानेवारी दरम्यान खेळल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी शमी भारतासाठी खूप महत्त्वाचा गोलंदाज असेल. मात्र त्यापूर्वी त्याची संघातून बाहेर होण्याची बातमी आली आहे.
आधी असं बोललं जात होतं की, भारतीय संघात पुनरागमन करण्यापूर्वी शमी बंगालसाठी रणजी ट्रॉफीमध्ये खेळेल. दुखापतीनंतर पुनरागमन करण्यापूर्वी अनेक खेळाडू फिटनेस प्राप्त करण्यासाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळतात. रणजी ट्रॉफी 2024-25 ला 11 ऑक्टोबर पासून सुरुवात होत आहे. स्पर्धेच्या सुरुवातीच्या दोन सामन्यांसाठी बंगाल क्रिकेट असोसिएशननं नुकतीच संघाची घोषणा केली. मात्र यामधून मोहम्मद शमीचं नाव गायब आहे.
बंगालचा संघ आपला पहिला सामना 11 ते 14 ऑक्टोबर दरम्यान उत्तर प्रदेश विरुद्ध आणि दुसरा सामना 18 ते 21 ऑक्टोबर दरम्यान बिहार विरुद्ध खेळणार आहे. याच दरम्यान 16 ऑक्टोबरपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. अशाप्रकारे, शमीचं न्यूझीलंडविरुद्ध मालिकेतही खेळणं अवघड वाटत आहे. आता हे पाहणं महत्त्वाचं असेल की, शमी क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन केव्हा करतो.
मोहम्मद शमीनं भारतासाठी शेवटचा सामना नोव्हेंबर 2023 मध्ये खेळला होता, जो विश्वचषकाचा फायनल सामना होता. तेव्हापासून तो दुखापतीमुळे टीम इंडियाच्या बाहेर आहे. शमी आयपीएल 2024 मध्ये देखील खेळला नव्हता. त्याचा 2023 विश्वचषक खूप चांगला गेला होता. तो विश्वचषकात सर्वाधिक विकेट (24) घेणारा गोलंदाज होता.
रणजीच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी बंगालचा संघ
अनुस्तुप मजूमदार (कर्णधार), अभिमन्यु ईश्वरन, सुदीप घरामी, सुदीप चटर्जी, रिद्धिमान साहा, शाहबाज अहमद, अभिषेक पोरेल, रितिक चटर्जी, एविलिन घोष, शुवम डे, आकाश दीप, मुकेश कुमार, सूरज जयसवाल, मोहम्मद कैफ, प्रदीप्ता प्रमाणिक, आमिर गनी , युधाजीत गुहा, रोहित कुमार और ऋषव विवेक
हेही वाचा –
ind vs ban; मयंक यादवनंतर आता या भारतीय गोलंदाजाची पाळी, दुसऱ्या टी20 मध्ये पदार्पण करणार का?
WTC इतिहासात अशी कामगिरी करणारा जो रुट पहिलाच, टाॅप-10 मध्ये रोहित शर्मा एकमेव भारतीय
शाकिबनंतर आता हा अनुभवी क्रिकेटपटू निवृत्तीच्या वाटेवर; भारताविरुद्ध खेळणार शेवटचा सामना