बंगळूरु। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात आज(27 फेब्रुवारी) दुसरा टी20 सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 4 बाद 190 धावा केल्या आहेत. भारताकडून कर्णधार विराट कोहलीने अर्धशतकी खेळी केली आहे.
याबरोबरच विराटने रोहित शर्माच्या एका खास विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. विराटने आज 38 चेंडूत 6 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 72 धावा केल्या. विराटची ही आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याची 20 वी वेळ होती.
त्यामुळे विराटने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्यामध्ये रोहितची बरोबरी केली आहे. त्यामुळे हे दोघेही या यादीत संयुक्तरित्या अव्वल स्थानावर आले आहेत.
रोहितने 94 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांत 20 वेळा 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी केली आहेत. यात त्याच्या 4 शतके आणि 16 अर्धशतकांचा समावेश आहे. तर विराटने 67 सामन्यांत 20वेळा अर्धशतकी खेळी केल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक वेळा 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणारे खेळाडू-
20- रोहित शर्मा, सामने- 94
20- विराट कोहली, सामने- 67
16- मार्टिन गप्टील, सामने- 76
15- ख्रीस गेल, सामने- 56
15- ब्रेंडन मॅक्क्यूलम, सामने- 71
महत्त्वाच्या बातम्या-
–१ मार्च ठरणार टीम इंडियाच्या सदस्यांसह चाहत्यांसाठी सर्वात खास दिवस
–रोहित शर्माला विश्रांती, दुसऱ्या टी२०साठी अशी आहे ११ जणांची टीम इंडिया