बंगळुरु। आज(19 जानेवारी) एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात तिसरा आणि निर्णायक कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 9 बाद 289 धावा केल्या आहेत.
तसेच भारताकडून गोलंदाजी करताना वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या आहे. त्याचबरोबर शमीने एक खास पराक्रमही केला आहे. त्याने या सामन्यात 10 षटके गोलंदाजी करताना 63 धावा देत 4 विकेट्स घेतल्या.
शमीची ही वनडेमध्ये एका सामन्यात 4 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची 10 वेळ आहे. त्यामुळे सर्वाधिक वेळा वनडेत 4 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत त्याने अनिल कुंबळे आणि जवागल श्रीनाथ यांची बरोबरी केली आहे.
कुंबळे आणि श्रीनाथ यांनीही प्रत्येकी 10 वेळा वनडेत 4 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर अजित अगरकर आहे. अगरकरने 12 वेळा हा कारनामा केला आहे.
वनडेत सर्वाधिक वेळा 4 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज –
12 वेळा – अजित अगरकर
10 वेळा – मोहम्मद शमी
10 वेळा – अनिल कुंबळे
10 वेळा – जवागल श्रीनाथ
8 वेळा – जहिर खान
8 वेळा – रविंद्र जडेजा
अनेक दिवसांची प्रतिक्षा संपली, अखेर रोहित शर्माने 'तो' विक्रम केलाच!
वाचा????https://t.co/2II3CXWqvg????#म #मराठी #Cricket #TeamIndia #INDvsAUS @ImRo45— Maha Sports (@Maha_Sports) January 19, 2020
तिसऱ्या वनडेत भारतीय संघाला मोठा धक्का, हा मोठा खेळाडू झाला दुखापतग्रस्त
वाचा????https://t.co/mqLxZC7jNw????#म #मराठी #Cricket #TeamIndia #INDvsAUS— Maha Sports (@Maha_Sports) January 19, 2020