---Advertisement---

रोहित शर्माची एक बॅट किती दिवस टिकते तुम्हाला माहिती आहे का?

On: शनिवार, सप्टेंबर 26, 2020 7:03 PM
---Advertisement---

मुंबई । इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल 2020) 13 वा हंगाम युएईमध्ये खेळला जात आहे. दरम्यान, रोहितने सांगितले की, तो येथे किती बॅट घेऊन आला आहे. तसेच त्याची बॅट किती दिवस टिकते याचाही खुलासा त्याने केला आहे. मुंबई इंडियन्सचा  कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, जेव्हा तो छोट्या क्रिकेट प्रकारात खेळतो, तेव्हा त्याची बॅट एक-दोन महिने टिकते.

रोहितने मुंबई इंडियन्सच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, “माझी बॅट सहसा मोठी असते. ती जास्त दिवस चालते. मी म्हणेन चार ते पाच महिने. पण मी खेळत असलेल्या क्रिकेटच्या प्रकारावर अवलंबून असते. आपण टी20 खेळत असाल, तर आपल्याला बरेच शॉट्स मारण्याची आवश्यकता आहे. बर्‍याच नवीन शॉट्ससाठी आपल्याला सराव करण्याची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत तुमची बॅट फुटू शकते. याची खूप जास्त शक्यता असते.”

तो पुढे म्हणाला की, “आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटदरम्यान माझी बॅट सहसा एक किंवा दोन महिने टिकते. आम्हाला माहित आहे की, ही वेळ फार कठीण आहे. कुरियर वेळेवर येईल की नाही हे आम्हाला ठाऊक नाही. म्हणूनच मी माझ्याबरोबर नऊ बॅट आणल्या आहेत.”

रोहितने अबूधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) विरुद्ध 80 धावांची मॅच विनिंग खेळी साकारली. त्याच्या खेळीच्या जोरावर मुंबईने स्पर्धेतील पहिला विजय नोंदविला. गतविजेत्या मुंबई इंडियन्सला चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) विरुद्ध आयपीएल 2020 च्या सुरुवातीच्या सामन्यात पाच गडी राखून पराभव पत्करावा लागला होता. परंतु संघाने त्वरीत स्वत:ला सावरले आणि पुढच्या सामन्यात केकेआरला 49 धावांनी पराभूत केले.

या विजयासह संघाने युएईमधील पराभवाची मालिका खंडित केली. 2014 च्या आयपीएल हंगामात येथे खेळल्या गेलेल्या सर्व सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सचा पराभव झाला होता. हा संघ पुढील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध (आरसीबी) सोमवारी (28 सप्टेंबर) सामना खेळणार आहे. दोन्ही संघांसाठी हा तिसरा सामना असेल. दोघेही एका सामन्यात विजयी झाले आहेत, तर एका सामन्यात पराभूत झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

हाच होणार सचिन तेंडुलकरचा जावई? पाहा कोणासोबत जोडलं जातंय साराचं नाव

न्यूझीलंड क्रिकेट संघाला ‘या’ कारणासाठी सरकारकडून मिळाला हिरवा कंदील

पंजाबचा फिरकीपटू रवी बिष्णोईने स्टिव्ह स्मिथला दिला ‘हा’ इशारा

ट्रेंडिंग लेख-

क्रिकेटच्या ग्राउंडचा राजनयात उपयोग करणारे मनमोहन सिंग तुम्हाला माहित आहेत का?

लालचंद राजपूत यांना पाकिस्तानी व्हिसा मिळावा यासाठी झिम्बाब्वेचे प्रयत्न, ‘हे’ आहे कारण

आयपीएलमध्ये शेवटच्या २ षटकात गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडणारे ३ फलंदाज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---