भारतीय क्रिकेट संघाचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ याला मागील जवळपास दीड वर्षापेक्षा अधिकच्या काळापासून भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा रतीब घातल्यानंतरही त्याला संधी न मिळाल्याने अनेक जण प्रश्न उपस्थित करतात. आता या यादीमध्ये भारतीय संघाचा माजी सलामीवीर मुरली विजय याचा देखील समावेश झाला आहे.
पृथ्वी शॉ मागील दोन हंगामापासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणात धावा करताना दिसतोय. तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये त्याने मुंबईचे नेतृत्व करताना फलंदाज व कर्णधार या दोन्ही नात्याने उत्कृष्ट कामगिरी केली. असे असताना देखील त्याला भारतीय संघात पुनरागमन करता आले नाही. काही दिवसांपूर्वी झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत त्याला संघात निवडले गेलेले. मात्र, अंतिम अकरामध्ये जागा बनवण्यात तो अपयशी ठरला.
असे असतानाच मुरली विजय याने भारतीय संघाच्या टीम मॅनेजमेंटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एका मुलाखतीत बोलताना तो म्हणाला,
“भारतीय संघात केएल राहुल आणि शुबमन गिल भारतीय संघात आपली जागा बनवण्यात यशस्वी ठरले आहेत. मात्र, पृथ्वी शॉ का खेळत नाही हे मला समजत नाही. संघ व्यवस्थापनाला याबाबत प्रश्न विचारलाय हवे. कारण संघात त्याच्यासारख्या खेळाडूची जागा नक्कीच बनते.”
पृथ्वी शॉ हा भारतीय संघाने जिंकलेल्या 2018 अंडर 19 क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार आहे. त्यानंतर त्याला संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात त्यांनी शतक झळकावून चांगली सुरुवात केली होती. मात्र, त्यानंतर अपयशी ठरल्यामुळे त्याला संघातून बाहेर व्हावे लागले. नुकतेच मुंबई येथे एका मॉडेलशी झालेल्या भांडणामुळे तो चर्चेत आला होता.
(Murali Vijay Question On Prithvi Shaw Is Not Part Of Indian Cricket Team)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अविश्वसनीय! हरमनप्रीतने भिरकावला चेंडू, पण सीमारेषेवर ‘सुपरवुमन’ हरलीनने पकडला अफलातून कॅच, पाहा Video
वर्ल्डकपनंतर रोहितचा पत्ता कट करून हार्दिक बनू शकतो भारताचा पर्मनंट कॅप्टन, गावसकरांची मोठी भविष्यवाणी