पाकिस्तान क्रिकेटमध्ये मागच्या काही दिवासंमध्ये मोठे बदल घडले आहेत. बीसीसीआयवर वारंवार निशाणा साधणारा पीसीबीचे अध्यक्ष रमीझ राजा यांना बुधवारी (21 डिसेंबर) अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा कारभार पाहण्यासाठी मजम सेठी यांच्या अध्यक्षतेखाली 14 सदस्यांची समिती नियुक्त केली गेली आहे. गुरुवारी (22 डिसेंबर) नजम सेठी यांनी पत्रकार परिषद घेत, अनेक विषयांवर भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी भारताविरुद्ध द्विपक्षीय मालिका खेळण्याविषयी देखील मत व्यक्त केले.
भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दोन बलाढ्य संघ आहेत. पण मागच्या मोठ्या काळापासून या दोन संघांमध्ये एकही द्विपक्षीय मालिका खेळली गेली नाहीये. दोन्ही देशांमधील राजकीय संबंध चांगले नसल्यामुळे क्रिकेट बोर्ड देखील अशा द्विपक्षीय मालिकेचे आयोजन करू शकत नाहीत. हीच गोष्ट नजम सेठी (Najam Sethi) यांनी पत्रकार परिषदेत पुन्हा स्पष्ट केली.
रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी पीसीबीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर बोर्डाची सर्व कामकाज सध्या नजम सेठी पाहत आहेत. भारताविरुद्ध द्विपक्षीय मालिका खेळण्याविषयी बोलताना नजम सेठी म्हणाले की, “जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिका आणि इतर संबंधांविषयी बोलण्याची वेळ येते, तेव्हा देशांच्या सरकारकडून सल्ला घ्यावा लागतो.”
भारतीय संघाने त्यांचा शेवटचा पाकिस्तान दौरा 2008 साली केला होता. तेव्हा पाकिस्तानमध्ये आशिया चषकाचे आयोजित केले गेले होते. त्यानंतर 26 डिसेंबर 2008 रोजी मुंबई बाँम्बस्फोट घडला आणि तेव्हापासून भारतीय संघ पाकिस्तानमध्ये एकही द्विपक्षीय मालिका खेळण्यासाठी गेला नाही. या बाॅम्पस्फोटानंतर 2009 साली उभय संघांमधील द्विपक्षीय मालिका रद्द केली गेली होती. पाकिस्तान संघ मात्र 2012 मध्ये भारत दौऱ्यावर आला होता, जेव्हा उभय संघांमध्ये सहा सामन्यांची मालिका खेळली गेली होती. त्यानंतर मागच्या 10 वर्षांमध्ये या दोन संघात एकही द्विपक्षीय मालिका खेळली गेली नाहीये. सध्या हे दोन्ही संघ फक्त विश्वचषक आणि आशिया चषकासारख्या स्पर्धांमध्ये एकमेकांसोबत खेळतात.
पाकिस्तानला 26 डिसेंबर पासून मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी पीसीबीने संघ नियुक्त केा आहे. मात्र नजम सेठींच्या नेतृत्वातील समिती मात्र या संघावर खुश नसल्याचेच दिसते. या संघाविषयी बोलताना सेठी म्हणाले की, “मला माहीत नाही की, संघात बदल करण्याची गरज आहे की नाही. संघाची घोषणा केलीच नसती, तर चांगले झाले असते.” दरम्यान, सेठी 2013 ते 2018 दरम्यान पीसीबीचे अध्यक्ष राहिले आहेत आणि त्यांना या पदाचा चांगला अनुभव देखील आहे. (New PCB chairman’s stance on relations with India)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अविश्वसनीय! कुलदीपला बाहेर बसवल्यामुळे गावसकरांचा चढला पाहा, रागाच्या भरात केले मोठे विधान
चलनी नोटांवर शोभणार जगज्जेता मेस्सी? अर्जेंटिना सरकार लवकरच घेऊ शकते निर्णय