---Advertisement---

केवळ तिलकरत्ने दिल्शानला जमलेला तसा विक्रम न्यूझीलंडच्या एमीलिया केरने केलाय, तोही भारताविरुद्ध

Amelia-Kerr
---Advertisement---

भारतीय महिला संघ आणि न्यूझीलंड महिला संघात खेळली जाणारी पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका गुरुवारी (२४ फेब्रुवारी) संपली. आगामी विश्वचषक न्यूझीलंडमध्ये खेळला जाणार असल्यामुळे भारतीय संघासाठी मालिका महत्वाची होती. परंतु, भारतीय संघाला मालिकेत खूपच निराशाजनक पराभवाचा सामना करावा लागला. पण न्यूझीलंडची अष्टपैलू एमीलिया केर (Amelia Kerr) हिने तिच्या संघासाठी अप्रतिम प्रदर्शन केले आणि मालिकावीर ठरली. एमीलियाने एक खास विक्रमही स्वतःच्या नावावर केला.

केरने भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत ११७.६६ च्या सरासरीने ३५३ धावा केल्या. यामध्ये तिने एक शतक आणि तीन अर्धशतके ठोकली. गोलंदाजीचा विचार केला, तर संपूर्ण मालिकेत तिने एकूण सात विकेट्स घेतल्या. या जबरदस्त प्रदर्शनाच्या जोरावर ती मालिकेत सर्वोत्तम प्रदर्शन करणारी खेळाडू ठरली. मालिकेत तिने ९ झेलही घेतले आहेत. एका द्विपक्षीय मालिकेत असे प्रदर्शन करणारी ती जागतिक क्रिकेटमधील दुसरी खेळाडू ठरली आहे.

श्रीलंकेचा दिग्गज तिलकरत्ने दिल्शान एकमेव खेळाडू आहे, ज्याने एका द्विपक्षीय मालिकेत केरपेक्षा अधिक सरस कामगिरी केली होती. २०१४ साली श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या मालिकेत दिल्शानने केरपेक्षा चांगले प्रदर्शन करून दाखवले होते. महिला क्रिकेटमध्ये असे उत्कृष्ट प्रदर्शन करणार केर पहिली खेळाडू ठरली आहे.

शेवटच्या सामन्यानंतर एमीलिया केल म्हणाली की, “मागचे काही आठवडे चांगले राहिले आहेत. संघातील सर्वांनी चांगले प्रदर्शन केले आहे. आम्हाला माहिती आहे की, भारत एक उत्तम संघ आहे आणि आम्ही विश्वचषकात लक्ष देऊ. मी प्रत्येक चेंडूला सन्मान देऊन खेळत होते आणि विश्वचषकात ही गोष्ट कायम ठेवेल. मी लहानपणीपासून फलंदाजी आणि गोलंदाजी केली आहे, त्यामुळे दोन्ही भूमिका पार पाडताना मला अडचण येत नाही. एका संघाच्या रूपात मला स्वतःवर आणि सहकाऱ्यांवर विश्वास आहे. मालिका जिंकल्यानंतरही आम्हाला आमच्या क्षेत्ररक्षणावर काम करावे लागेल.”

दरम्यान, भारत आणि न्यूझीलंड महिला संघांमधील या एकदिवसीय मालिकेचा विचार केला, तर भारताने खूपच खराब प्रदर्शन केल्याचे दिसले. मालिकेतील पहिल्या चार सामन्यांमध्ये भारतीय संघाना पराभवाचा सामना करावा लागला. पण अखेर शेवटच्या सामन्यात संघाने विजय मिळवला आणि क्लीन स्वीपपासून स्वतःला वाचवले.

पुढच्या महिन्यात म्हणजेच ४ मार्चपासून न्यूझीलंडमध्ये महिला विश्वचषक खेळला जाणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ही मालिका विश्वचषकाच्याच पार्श्वभूमीवर खेळली गेली होती.

महत्वाच्या बातम्या –

जेव्हा भेटले दोन ‘खिलाडी’…! सोशल मीडियावर व्हायरल होतोय एमएस धोनी आणि अक्षय कुमारचा फोटो

पहिले पाढे पंचावन्न! भारतीय कसोटी संघाची निवड होताच रहाणे-पुजारा रणजीच्या दुसऱ्या सामन्यात फ्लॉप

भारतीय कर्णधार मिताली राजने रचला इतिहास, संघाला क्लिन स्वीपपासून वाचवत मोठा विक्रमही केला नावे

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---