भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात पार पडलेल्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने २-१ ने विजय मिळवला होता. आता या दोन्ही संघांमध्ये तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने ३८ धावांनी विजय मिळवला आहे. हा सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही देशांचे राष्ट्रगीत गायले गेले होते. त्यावेळी माजी भारतीय क्रिकेटपटू इरफान पठाण आणि युसुफ पठाण यांची मुलेदेखील राष्ट्रगीत गाण्यासाठी टिव्हीसमोर उभे होते, ज्याचे फोटो इरफान पठाणने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. (National anthem learnings irfan pathan shares a picture of his son and nephews signing jana gana mana)
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी प्रथा आहे की, सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघाचे राष्ट्रगीत गायले जाते. तसेच राष्ट्रगीत गाण्याचा पहिला मान हा यजमान संघाला मिळत असतो. राष्ट्रगीत सुरू असताना अंगाला शहारे आल्याशिवाय राहत नाहीत. अशातच रविवारी (२५ जुलै) पहिला टी-२० सामना सुरू होण्यापूर्वी श्रीलंकेनंतर भारताचे राष्ट्रगीत गायले गेले. त्यावेळी इरफान पठाण आणि युसुफ पठाण यांची मुले टीव्हीसमोर उभे राहून राष्ट्रगीत गात असताना दिसून आली.
एक सेकंदही वेळ न दवडता इरफानने हा क्षण टिपला आणि हा फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यावर त्याने कॅप्शन म्हणून, “राष्ट्रगीत शिकत आहे..” असे लिहिले आहे.
National anthem ???????? #learning pic.twitter.com/cnneootCQX
— Irfan Pathan (@IrfanPathan) July 25, 2021
भारतीय संघात २ खेळाडूंनी केले पदार्पण
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या तीन ट -२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना रविवारी खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघातील २ युवा खेळाडू पृथ्वी शॉ आणि वरून चक्रवर्ती यांना संधी देण्यात आली होती. वनडे मालिकेत चांगली कामगिरी करणारा पृथ्वी शॉ या सामन्यातही चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा व्यक्त केली गेली होती. परंतु या सामन्यात तो पहिल्याच चेंडूवर यष्टीरक्षकाच्या हातून झेलबाद होऊन माघारी परतला. तर वरून चक्रवर्तीने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात ४ षटक गोलंदाजी केली. यामध्ये त्याने २८ धावा खर्च करत १ गडी बाद केला.
भारतीय संघाने मिळवला ३८ धावांनी विजय
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटक अखेर १६४ धावा केल्या होत्या. यामध्ये सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ५० आणि कर्णधार शिखर धवनने ४६ धावांचे योगदान दिले. या धावांचा पाठलाग करताना, श्रीलंका संघाकडून चरिथ असलंकाने ४४ आणि अविष्का फर्नांडोने २६ धावांची खेळी केली. श्रीलंका संघाचा डाव १८.३ षटकात संपुष्टात आला होता. या सामन्यात भारतीय संघाने ३८ धावांनी विजय मिळवला. तसेच ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
श्रीलंकेत असलेले सूर्यकुमार आणि पृथ्वी धरणार इंग्लंडची वाट, पण कधी? घ्या जाणून
संजूला बाद करण्यासाठी श्रीलंकेच्या क्षेत्ररक्षकाची ‘चिटिंग’! मग फलंदाजाने शिकवला चांगलाच धडा