पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. यानंतर दोन्ही देशात क्रिकेट संबंधाविषयी पुन्हा एकदा वाद सुरू झाले आहेत. माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली यांनी विनंती केली आहे की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सर्व संबंध तोडले गेले पाहिजेत. तसेच पाकिस्तानच्या एका खेळाडूने भारताविरुद्ध खळबळजनक वक्तव्य केलं आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये वाढत्या वादामुळे आता पाकिस्तान महिला क्रिकेटर सलामीवीर फलंदाज गुल फिरोजाच्या वक्तव्यामुळे सगळीकडे चर्चांना उधाण आलं आहे. तिचं म्हणणं आहे की, तिला भारतामध्ये क्रिकेट खेळण्याची अजिबात इच्छा नाही. तिने या महिन्यात आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकप क्वालिफायर दरम्यान सलामीवीर फलंदाज म्हणून तीन वनडे सामने खेळले होते.
गुल फिरोजा म्हणाली, पाकिस्तान संघ या वर्षात सप्टेंबर मध्ये होणाऱ्या महिला क्रिकेट वर्ल्ड कप 2025 साठी भारतात येणार नाही. पाकिस्तानने आत्ताच महिला क्रिकेट वर्ल्ड कप 2025 क्वालिफाय केला आहे. महिला क्रिकेट वर्ल्ड कप 2025 मध्ये पाकिस्तानच्या एंट्री नंतर आता या स्पर्धेसाठी हायब्रीड मॉडेलची संभावना वाढली आहे. महिला क्रिकेट वर्ल्डकप 2025 स्पर्धेचे यजमानपद भारताकडे आहे. अशा मध्येच पाकिस्तानचे सामने भारताच्या बाहेर कोणत्याही न्यूट्रल ठिकाणावर आयोजित केले जाऊ शकतात.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नकवी आधीच म्हटले आहेत की, पाकिस्तान महिला क्रिकेट संघ वर्ल्डकप 2025 साठी भारतात येणार नाही. यादरम्यान गुल फिरोजाने पाकफॅशनशी बोलताना म्हटले, आम्हाला एवढे तर माहीतच आहे की आम्ही आशियाई परिस्थितीत खेळणार आहोत. तसेच आम्ही भारतात खेळणार नाही, ही गोष्ट स्पष्ट आहे आणि आम्ही भारतात खेळण्यासाठी इच्छुक सुद्धा नाही.
ती पुढे बोलताना म्हणाली, मला आशा आहे की महिला क्रिकेट वर्ल्ड कप 2025 चे सामने जिथे खेळले जातील मग ते श्रीलंका, असो किंवा दुबई तेथील परिस्थिती आशिया सारखीच असेल. वर्ल्ड कप 2025 क्वालिफायर सामने घरेलू मैदान पाकिस्तानमध्ये होते आणि ग्राउंड स्टाफने त्याच्यांच अनुसार ट्रैक तयार केले होते. आता जिथे महिला क्रिकेट वर्ल्ड कप 2025 सामने खेळले जातील तेथील परिस्थिती घरच्या मैदानासारखीच असेल. यामुळे आमची तयारी त्याप्रमाणेच असेल आणि आम्ही त्यासाठी तयार आहोत असेही ती म्हणाली.