इंडियन प्रीमियर लीगच्या 17 व्या हंगामाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. तर चेन्नई आणि आरसीबी यांच्या सामन्यानं 22 मार्च रोजी आयपीएलच्या रनंसग्रामाला सुरुवात होणार आहे. तसेच आयपीएलच्या यंदाच्या हंगामात अनेक विक्रम होतील, काही मोडले जातील. चौकार-षटकारांचा पाऊस पडेल. एका चषकासाठी दहा संघ मैदानात उतरतील. प्रत्येक संघ प्रत्येक सामना जिंकण्याचा जिवापाड प्रयत्न करेल. पण तुम्हाला माहितेय का, आयपीएलमध्ये लागोपाठ सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम कोणत्या संघाच्या नावावर आहे. हा लाजिरवाणा विक्रम कोणत्या संघाने केलाय? याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.
आजपर्यतच्या आयपीएलच्या इतिहासात लागोपाठ सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम कोलकात्याच्याही नावावर आहे. त्यानंतर यायादीत पंजाब किंग्जचा संघ आहे. तसेच गौतम गंभीरच्या नेतृत्वातील कोलकाता संघाने लागोपाठ 10 सामने जिंकले होते. तर हा विक्रम आयपीएल 2014-15 च्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सच्या नावावर या विक्रमाची नोंद झाली आहे. तर या यादीमध्ये मुंबई इंडियन्सचाही समावेश आहे.
याबरोबरच, या विक्रमामध्ये मुंबई इंडियन्स बरोबर राजस्थान, चेन्नई, हैद्राबाद याच्या नावावर सलग 6 विजय आहेत. तर आरसीबी बरोबर चेन्नईचा संघ आहे. तर या दोन्ही संघानी मिळून सलग 7सामने जिंकले होते. तसेच आयपीएलच्या इतिहासात सलग सर्वाधिक सामने गमावण्याचा लाजिरवाणा विक्रम दिल्ली कॅपिटल्स आणि पुणे वॉरियर्स इंडियाच्या नावावर आहे.
Most Consecutive Matches Won in IPL
10 – KKR (2014-15)
8 – KX1P (2013-14)
7 – RCB (2011)
7 – CSK (2013)
6 – MI (2008)
6 – RR (2008)
6 – CSK (2014)
6 – MI (2017)
6 – SRH (2018) pic.twitter.com/a40dp69MUZ— CricBeat (@Cric_beat) March 15, 2024
दरम्यान, आयपीएल 2014 हंगामात दिल्ली कॅपिटल्सने सलग 11 सामने गमावले होते. तर आयपीएल 2012 च्या मोसमात पुणे वॉरियर्स इंडिया संघाने सलग 11 सामने पराभवाचा सामना केला होता. यानंतर पुणे वॉरियर्स इंडियाही या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. आयपीएल 2013 च्या मोसमात पुणे वॉरियर्स इंडियाला सलग 9 पराभवांचा सामना करावा लागला होता.
यावेळी आयपीएल 2012 च्या हंगामात सौरव गांगुली हा पुणे वॉरियर्स इंडियाचा कर्णधार होता. सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली पुणे वॉरियर्स इंडियाने सलग 11 सामने हरण्याचा लाजिरवाणा विक्रम केला होता. तर आयपीएल 2013 च्या मोसमात पुणे वॉरियर्स इंडियाचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूज होता. त्यालाही संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आले होते.
महत्त्वाच्या बातम्या-