टी-20 विश्वचषक 2022 मध्ये गुरुवारी (27 ऑक्टोबर) पाकिस्तानला झिम्बाब्वे संघाकडून पराभव मिळाला. पाकिस्तानने हा सामना गमावल्यानंतर अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. झिम्बाब्वे संघ टी-20 विश्वचषकात कॉलिफाय करेल की नाही, याची खात्री सुरुवातीला कोणी देत नव्हते, पण आता याच संघाने पाकिस्तानला धूळ चारत स्वतःची गुणवत्ता सिद्ध केली. झिम्बाब्वे संघात मागच्या काही वर्षांमध्ये चांगल्याच सुधारणा झाल्याचे दिसले आहेत. या सुधारणा घडवून आणण्यासाठी भारतीय संघाचे माजी खेळाडू आणि प्रशिक्षक लालचंद राजपूत यांची भूमिका महत्वाची राहिली आहे.
लालचंद राजपूत (Lalchand Rajput) भारतीय संघाचे माजी खेळाडू आणि भारताचे माजी प्रशिक्षक राहिले आहेत. त्यांना टी-20 विश्वचषक 2007 मध्ये भारतीय संघाच्या प्रशिक्षकाच्या रूपात जबाबदारी पार पाडली होती. त्यांनी झिम्बाब्वे क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकदाची जबाबदारी देखील सांभाळली आहे. सध्या ते झिम्बाब्वे संघाचे टेक्निकल डायरेक्टर म्हणून काम करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात झिम्बाब्वे संघ चांगली कामगिरी करत आहे आणि गुरुवारी त्यांना पाकिस्तानसारख्या बलाढ्य संघाला पराभवाची धूळ चारली आहे. त्यांनी संघाच्या या चांगल्या प्रदर्शनाविषयी नुकतीच एक खास प्रतिक्रिया दिली आहे.
लालचंद राजपूत 2018 साली झिम्बाब्वे संघाशी पहिल्यांदा जोडले गेले होते. त्यावेळी संघ खूप कमजोर वाटत होता, असे त्यांनी स्वतः सांगितले आहे. परंतु आता परिस्थिती सुधारली आहे आणि संघ चांगले प्रदर्शन करत असल्याचे आपण पाहू शकतो. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात झिम्बाब्वेने शेवटच्या चेंडूवर निसटचा विजय मिळवला. पराभवानंतर पाकिस्तानसाठी मात्र विश्वचषकातील पुढचा प्रवास खूपच कठीण होऊन बसला आहे. पाकिस्तानला आता एकही सामना न गमावता पुढे जावे लागेल.
आधी मुख्य प्रशिक्षक आणि आता टेक्निकल डायरेक्टरच्या भूमिकेत संघसोबत असताना काय सुधारणा केली? या प्रश्नावर लालचंद यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, “जेव्हा मी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त झाले, तेव्हा संघ 2019 विश्वचषकात जागा मिळवू शकला नव्हता. माझे लक्ष्य हेच होते की, आधी आम्हाला विश्वचषकासाठी क्लालिफाय व्हायचे आहे. कोविड काळात देखील आम्ही यावर काम करत राहिलो.”
भारतीय संघासोबत टी-20 विश्वचषकासाठी राजपूतांनी देखील दक्षिण आफ्रिका केला होता. या दौऱ्यात त्यांना आलेला अनुभव आता झिम्बाब्वे संघासोबत कामी आला का? या प्रश्नावर उत्तर देत राजपूत म्हणाले, “भारतीय संघासोबत त्यावेळी काम करण्याचा अनुभव नक्कीच कामी आला आहे. आम्ही या संघातील खेळाडूंनी त्याच पद्धतीने तयार केले आहे. आम्ही संघाला मानसिक दृष्ट्या चांगले बनवू शकतो आणि विरोधी संघांविरुद्ध रणनीती देखील बनवू शकतो. पण तरीही मैदानात मात्र खेळाडूंना स्वतःचे 100 टक्के योगदान द्यावे लागते.”
दरम्यान, पाकिस्तान आणि झिम्बाब्वे संघातील या सामन्याचा विचार केला, तर झिम्बब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मर्यादित 20 षटकांमध्ये झिम्बब्वेने 8 विकेट्सच्या नुकसानावर अवघ्या 130 धावा केल्या होत्या. पण पाकिस्तानला हे सोपे लक्ष्य देखील गाढता आले नाही. पाकिस्तान संघ 20 षटकांमध्ये 8 विकेट्सच्या नुकसानावर 129 धावांपर्यंतच पोहोचू शकला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
भारतीय यष्टीरक्षक कार्तिककडून मोठी चूक, प्रेक्षकांनी लावल्या ‘धोनी…धोनी’च्या घोषणा
‘ते काय लई भारी आहेत का? पुढच्या आठवड्यात जातील बाहेर’, भारताविरुद्ध पाकिस्तानच्या दिग्गजाने ओकली गरळ