भारतीय संघाला वेस्ट इंडिज संघाने पाचव्या टी20 सामन्यात पराभूत केले. उभय संघांतील ही मालिका वेस्ट इंडिजने 3-2 अशा अंतराने जिंकली. भारताच्या या पराभवानंरत अनेक माजी क्रिकेटपटू आपली प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट याने देखील आपले मत मांडले.
सलमान बट (Salman Butt) त्याच्या युट्यूब चॅनेलवर बोलताना म्हणाला की, “आमचा संघ युवा असल्याचे कारण भारताला देता येणार नाही. कारण त्यांनी असा संघ निवडण्याची ही पहिली वेळ नाहीये. याआधीही भारताचा युवा संघ अनेक मालिका खेळला आहे. अनेकजण म्हणतील की, ही एक टी20 मालिका होती आणि भारताचे वरिष्ठ खेळाडू यात खेळत नव्हते.”
पुढे माजी पाकिस्तानचा कर्णधार म्हणाला की, “भारतीय संघात युवा खेळाडूंची निवड पहिल्यांदा झाली नाहीये. असे अजिबात नाही की, वेस्ट इंडिजचा खूप मोठा संघ आहे आणि त्यांना पराभूत करणे खूप कठीण होते. निश्चितच त्यांच्याकडे भरपूर खेळाडू आहेत. मात्र, भारतीय संघाकडून ज्या प्रकारची कामगिरीची अपेक्षित होती, तसे प्रदर्शन संघाला करता आले नाही. या पराभवानंतर भारतीय संघाच्या आत्मविश्वासावरही परिणाम होईल,” असेही सलमान बट म्हणाला.
सामन्याचा निकाल –
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाचव्या टी20 सामन्यात भारतीय संघ 8 विकेट्सने पराभूत झाला. प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित 20 षटकात 9 विकेट्स गमावून 165 धावा करता आल्या. भारतासाठी सूर्यकुमार यादव याने 45 चेंडूत सर्वाधिक 61 धावा केल्या. मात्र, बाकीचे फलंदाज अपयशी ठरले. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने हे लक्ष्य 18 षटकांत केवळ 2 गडी गमावून पूर्ण केले. वेस्ट इंडिजकडून ब्रँडन किंग याने तुफानी खेळी केली. त्याने पाच चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 55 चेंडूत 85 धावा केल्या, ज्यासाठी त्याला सामनावीर म्हणून निवडले गेले. (pakistani player salman butt criticized team india perfomnce)
महत्वाच्या बातम्या-
आशिया कप 2023 पूर्वीच पाकिस्तान बनू शकतो नंबर 1 वनडे संघ, जाणून घ्या कसा?
भारत पाकिस्तान सामन्याबाबत रविंद्र जडेजाचे मोठे वक्तव्य, म्हणाला आम्ही 100 टक्के