आज (04 ऑगस्ट) पॅरिस ऑलम्पिकमध्ये भारतासाठी महत्तवाचा दिवस ठरला. पॅरिस ऑलम्पिकमध्ये आज भारत विरुद्ध ग्रेट ब्रिटन यांच्या खेळल्या गेलेल्या हाॅकी सामन्यात भारतीय संघानं ग्रेट ब्रिटनचा पेनाॅल्टी शूट आउटमध्ये 4-2 ने धुव्वा उडवला आहे. जवळपास 42 मिनिटे भारतीय संघ केवळ 10 खेळाडूंसह खेळताना ग्रेट ब्रिटनला 1-1 बरोबरीवर रोखलं. नंतर भारतानं पेनल्टी शूट आऊटमध्ये अप्रतिम कामगिरी करत 4-2 ने विजय मिळवला.
गोलकीपर पीआर श्रीजेश भारताच्या या विजयाचा हिरो ठरला आहे. त्यानं सामन्यात उल्लेखनीय कामगिरी करुन दाखवली. श्रीजेश पूर्ण सामन्यात सीमेवरील सैनिकासारखा लढला, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. भारतीय गोलकीपरनं काहीही झालं तरी प्रतिस्पर्धांना गोलची रेषा पार करु दिली नाही. त्यानं सामन्यात गोलवर येणारे जवळपास 10 शाॅट्स रोखले, ज्यामुळे भारतीय संघाला 1-1 ने बरोबरी राखता आली. शेवटी पेनाॅल्टी शूट ऑउटमध्ये त्यानं आक्रमक भूमिका घेत प्रतिस्पर्धांवर धावत जात गोल रोखले. त्याची ही कामगिरी हाॅकीच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी पैकी एक मानली जात आहे.
सामन्यामध्ये कर्णधार हरमनप्रीत सिंगने दुसऱ्या हाफमध्ये गोल करून भारताला आघाडी मिळवून दिली. त्याच हाफमध्ये ग्रेट ब्रिटननं देखील गोल करून बरोबरी साधली. त्यानंतर सामन्यात दोन्ही संघाला गोल करण्यात यश आलं नाही. शेवटी सामना बरोरीत सुटला. त्यानंतर पेनल्टी शूट आऊट मध्ये भारतानं ग्रेट ब्रिटनला 4-2 ने लोळवले. पेनाॅल्टी शूट आउटमध्ये हरमनप्रीत सिंग, ललित, सुखजीत आणि राजकुमार यांनी अप्रितम कौशल्य दाखवत ब्रिटनच्या गोलकीपरला चकवा देत गोल केले.
हेही वाचा-
इतिहास घडला! भारतीय हॉकी संघाची सेमीफायनलमध्ये एंट्री, पेनल्टी शूटआऊटमध्ये मिळवला शानदार विजय
महिला प्रीमियर लीगमध्ये होणार सीएसकेची एंट्री? लवकरच घेतला जाईल मोठा निर्णय
IND vs SL ‘या’ दिग्गज खेळाडूचा मोठा रेकाॅर्ड कोहलीच्या निशाण्यावर..!