भारतीय क्रिकेट संघाचा युवा आणि स्टार खेळाडू पृथ्वी शॉची मागील वर्षात आयपीएलमध्ये कामगिरी चांगली झाली नव्हती. तसेच ऑस्ट्रेलियामध्येही त्याच्या खराब प्रदर्शनानंतर पहिल्या कसोटीनंतर त्याला भारतीय संघातून बाहेर केले होते. परंतु या सर्व घटनेनंतर पृथ्वी शॉने त्याच्या खेळात लक्ष देत देशांतर्गत क्रिकेटमधून चांगले पुनरागमन केले. आयपीएलच्या 14 व्या हंगामात तो फॉर्ममध्ये असल्याचे दिसत होते. दरम्यान, त्याच्या त्याच्या कारकिर्दीतील काही अनुभव नुकतेटच सांगितले आहेत.
शॉने आयपीएल 2021 मध्ये चांगली कामगिरी केल्यानंतरही त्याची निवड विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकांसाठी करण्यात आली नाही. परंतु आशा आहे की, जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या मर्यादीत षटकांच्या भारती संघात तो असेल. दरम्यान, शॉने हर्षा भोगलेसोबत क्रिकबजला दिलेल्या मुलाखतीत 19 वर्षांखालील भारतीय संघातील आणि राहुल द्रविड बरोबरचे काही अनुभव सांगितले आहेत.
पृथ्वी शॉने सांगितले की, ‘विश्वचषकात 19 वर्षांखालील संघात खेळणे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. कारण 2008 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकला होता. तेव्हा मी सामना बघत होतो. मला त्या विश्वचषक स्पर्धेतबद्दल काहीच माहिती नव्हतं. तेव्हा मी 9 वर्षाचा होतो. मी आणि माझे वडील टीव्ही बघत होतो. मी वडिलांना विचारले की हा कोणता सामना आहे? तेव्हा वडिलांनी सांगितले की, 19 वर्षाखालील भारताचा सामना आहे. परंतु याबद्दल मला काहीच माहिती नव्हती. मला वडिलांनी आठवण करून दिली की, हा सामना आपण सोबतच पाहिला होता. तेव्हा माझ्या लक्षात आले की, मी विराटला त्यावेळेस खेळताना पाहिले होते. जेव्हा विराटनी विश्वचषक हातामध्ये घेतला होता, त्यावेळेस ची ही गोष्ट आहे.’
शॉ पुढे म्हणाला, ‘त्यानंतर लयीमध्ये सर्व काही घडत गेले. धावा होत गेल्या. त्यानंतर मला भारतीय संघाचा कर्णधार होण्याची सुवर्णसंधी मिळाली. हे माझे स्वप्न होते. भारतीय संघाचा कर्णधार होणे खूप मोठी गोष्ट आहे आणि अभिमानाची गोष्ट देखील आहे. जेव्हा आम्ही विश्वचषक जिंकलो, तेव्हाचा तो आमचा संघ उत्कृष्ट होता.’
साल 2018 मध्ये पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली 19 वर्षांखालील भारतीय संघाने विश्वचषक जिंकला होता. त्यावेळी द्रविड या संघाचा मुख्य प्रशिक्षक होता.
राहुल सर नेहमी नैसर्गिक खेळ खेळण्यास प्रवृत्त करतात
राहुल द्रविडबद्दल पृथ्वी शॉने सांगितले की, “विश्वचषक सामन्याअगोदर आम्ही 2 वर्ष सोबत दौरा केला आहे. 19 वर्षाखालील संघासोबत इंग्लंडमध्ये भारतीय संघाकडून त्यांच्यासोबत खेळलो आहे. परंतु त्यांनी कधीच कोणत्या गोष्टी आमच्यावर लादण्याचा किंवा गोष्टी बदलण्याचा प्रयत्न केला नाही. ते मला नेहमी सांगत होती की, तुला तुझा नैसर्गिक खेळ खेळायचा आहे. कारण त्यांना माहिती होते की, जर मी पावरप्लेच्या षटकात खेळलो तर त्याचा फायदा नक्कीच संघाला होईल.’
राहुल सर मानसिक गोष्टींवरती जास्त बोलत असतात
पृथ्वी शॉने सांगितले की, “ते फक्त मानसिक गोष्टीवर जास्त चर्चा करत असायचे आणि खेळाच्या रणनीतीवर देखील बोलायचे. जर तुम्ही सामना खेळायला जात असाल तर काहीतरी ध्येय ठेवा. ते नेहमी सांगायचे की, खेळायचा आनंद घेत राहा. इतकेच नव्हे तर सराव करताना देखील हेच सांगत. परंतु जर सतत चुका होत असतील तर मात्र जवळ येऊन ते समजावून सांगतात. या शिवाय ते मानसिक गोष्टींवर जास्त बोलत असायचे.”
जेव्हा राहुल सर असतात तेव्हा शिस्तबद्ध राहावं लागतं
राहुल द्रविड यांच्या शिस्तबद्ध पद्धतीवर बोलताना या युवा खेळाडूनी सांगितले की, “जेव्हा राहुल सर असतात, तेव्हा तुम्हाला शिस्तीचे पालन करावेच लागते. सरांची खूप भीती वाटायची. पण ते मैदानाबाहेर आमच्या सोबत मित्रांसारखे राहत असायचे. आमच्या सोबत रात्रीचे जेवण करायला यायचे. एखाद्या दिग्गज खेळाडू सोबत बसून जेवण करणे हे एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नाही.”
शॉने आयपीएल 2021 स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी 38.50 च्या सरासरीने आणि 166.49 स्ट्राईक रेट ने एकूण 308 धावा बनवल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
चुकीला माफी नाही! १८ वर्षीय नसीम शाहला नडली मोठी चूक; ‘या’ मोठी स्पर्धेतून काढले बाहेर
श्रीलंकेविरुद्ध शतक झळकवत मुशफिकुर रहीमचा खास पराक्रम, दिग्गजांच्या यादीत मिळवले स्थान