---Advertisement---

बापरे! कालच्या सामन्यानंतर एवढं कौतुक आलं राशीदच्या वाट्याला

---Advertisement---

शुक्रवारी ईडन गार्डन स्टेडियमवर पार पडलेल्या आयपीएल २०१८च्या क्वालिफायर २ सामन्यात सनरायझर्स हैदराबादने कोलकातावर १४ धावांनी विजय मिळवत दुसऱ्यांदा आयपीएलच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे.

आज हैद्राबादकडून रशीद खानने अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करताना हैद्राबादच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. त्याने आज फलंदाजी करताना १० चेंडूत नाबाद ३४ धावा केल्या. तर गोलंदाजी करताना १९ धावा देत ३ विकेट्स घेतल्या.

विशेष म्हणजे या सामन्यात त्याने २ झेल देखील घेतले. त्याने कालच्या सामन्यात सर्वाधिक स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. गोलंदाजी करताना सर्वात कमी इॅकाॅनाॅमीने धावा दिल्या. ४ षटकांत केवळ १९ देत ३ विकेट्स मिळवल्या. एका खेळाडूला धावबाद केले.

त्याची हीच कामगिरी पाहुन अनेक दिग्गजांनी त्याचे कौतुक केले आहे. त्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर, टाॅम मुडी, व्हीव्हीएस लक्ष्मण तसेच शेन वार्न सारख्या दिग्गजांचा समावेश आहे.

राशीद खानला सचिनने टी२०मधील सर्वात चांगला गोलंदाज म्हटले आहे.

“मला नेहमी वाटायचं की राशीद एक चांगला गोलंदाज आहे परंतु आता मला कोणतीही शंका नाही की तो टी२०मधील सर्वोत्तम गोलंदाज आहे. त्याच्याकडे फलंदाजीचे कौशल्य आहे. एक चांगला खेळाडू.” असे ट्विट करत सचिनने राशीदचे कौतुक केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

अखेर आयपीएलला मिळाला दुसरा सुपरमॅन, केला असा काही कारनामा की ऐकतच रहाल!

ना वार्न- ना मुरली, सचिन म्हणतो हा आहे जगातील सर्वोत्तम गोलंदाज

आयपीएलमध्ये सहाव्यांदा झाला असा कारनामा

IPL 2018: हैदराबाद दुसऱ्यांदा आयपीएलच्या अंतिम सामन्यात

इतिहास घडणार, भारतीय खेळाडू देशाबाहेरील या लीगमध्ये खेळणार!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment