भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी व सध्या भारतीय संघाचा सर्वात अनुभवी फलंदाज असलेला विराट कोहली यांच्यातील मित्रत्वाचे नाते सर्वांना परिचित आहे. विराट धोनी याचे कौतुक करत, त्याचे आपल्या कारकिर्दीत मोठे योगदान असल्याचे म्हणतो. धोनी देखील विराटचा तितकाच सन्मान करताना दिसतो. मात्र, एक वेळ अशी आली होती जेव्हा या दोन खेळाडूंमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता झाली होती. भारताचे माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांनी आपल्या पुस्तकात याबाबत खुलासा केला आहे.
जवळपास पाच वर्ष भारतीय संघाचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक राहिलेल्या आर श्रीधर यांनी नुकतेच आपल्या कोचिंग बियॉंड या पुस्तकाचे प्रकाशन केले. त्यामध्ये त्यांनी भारतीय संघाचे प्रशिक्षक असताना आलेल्या अनुभवांचे वर्णन केले आहे. त्यातील पान क्रमांक 42 वर धोनी व विराट यांच्या नात्याविषयी लिहिले. त्यांनी लिहिल्याप्रमाणे,
”विराट 2016 मध्येच वनडे व टी20 संघाचे कर्णधारपद घेण्यासाठी उताविळ होता. त्याला संघाचे तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये नेतृत्व करायचे होते. ही गोष्ट धोनीपर्यंत गेली असती तर कदाचित त्या दोघांच्या नात्यात दुरावा आला असता. त्यावेळी रवी शास्त्री यांनी विराटला समजावले. शास्त्री यांनी कॉल करून ते विराटला म्हटले, धोनीने कसोटी संघाचे नेतृत्व सोडले आहे. तुला त्याचा सन्मान करायला हवा. पुढे तो नेतृत्व तुझ्याकडेच देणार आहे. मात्र, तुला वाट पहावी लागेल. तू आता त्याचा सन्मान नाही केला तर तुझानंतर संघ सहकारी सन्मान करणार नाहीत.”
भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या धोनीने 2013 मध्ये कसोटीतून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर 2016 च्या अखेरपर्यंत तो वनडे व टी20 संघाचा कर्णधार होता. त्यानंतर त्याने विराट कोहलीकडे कर्णधारपद सोपवलेले.
(R Sridhar Reveal About Virat Kohli And MS Dhoni Relationship In His Book Coaching Beyond)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रिहान, रिवाने बाजी मारली; धीरूभाई अंबानी शाळेला टेनिसचे सांघिक विजेतेपद
विराट विरुद्ध सचिन वादात गांगुलीची उडी! म्हणाला, ‘असेच कोणीही 45 शतके…’