पहिल्यावहिल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना 18 जूनला सुरू होणार असून अवघ्या क्रिकेटविश्वाच लक्ष त्याकडे लागलेले आहे. या अंतिम सामन्याची जय्यत तयारी दोन्ही संघांनी सुरू केली आहे. भारताकडून या सामन्यात रोहित शर्मा, कर्णधार विराट कोहली जसप्रीत बुमराह सारखे सामना जिंकण्यात माहीर खेळाडू मैदानात दिसतील. तर न्युझीलंडकडून देखील केन विलियम्सन, रॉस टेलर आणि ट्रेंट बोल्टसारखे दिग्गज खेळाडू मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे हा सामना जिंकून कोण किताब पटकावेल याची उत्सुकता सर्वांनाच आहे. परंतु सामन्याआधी चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.
सामन्याच्या 5 ही दिवस होऊ शकतो पावसाचा व्यत्यय:
हवामान खात्याच्या अंदाजानुसार 18 ते 22 जून या पाचही दिवस पावसाचा व्यत्यय सामान्यादरम्यान होऊ शकतो. 18 जून पासून ते 22 जूनपर्यंत साउथॅटम्पनमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे, त्यामुळे ही निश्चितच चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे. कारण इतक्या रोमांचक सामन्यात कुणालाही पावसाचा व्यत्यय नकोय.
पावसाचा व्यत्यय बघता ठेवला आहे एक अतिरिक्त दिवस:-
जूनच्या महिन्यात इंग्लंडमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असते. अशावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ही गोष्ट लक्षात ठेवून या स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी एक राखीव दिवस ठेवला आहे.
अतिरिक्त दिवशी देखील निकाल न लागल्यास दोन्ही संघाना संयुक्तपणे विजेतेपद
जर 5 दिवसात काही व्यत्यय आला तर सहावा दिवशी खेळ खेळला जाईल. परंतु, जर सहाव्या दिवशी देखील ठोस निकाल न लागल्यास दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद बहाल केले जाईल. तसेच हा सामना जरी अनिर्णित राहिला तरी दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
जेव्हा प्रियंका चोप्रा म्हणाली होती, मोहम्मद अझरुद्दीनशी लग्न करायला आवडेल; व्हिडिओ होतोय व्हायरल
तोडफोड फलंदाजी! ‘या’ इंग्लंड फलंदाजाने तब्बल ११ षटकारांसह केली १३६ धावांची तुफानी खेळी