येत्या ६ फेब्रुवारीपासून भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील ३ वनडे सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुध्द झालेल्या वनडे मालिकेत भारतीय संघाला ३-० ने पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आगामी मालिकेत भारतीय संघ विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे. या मालिकेसाठी भारतीय कर्णधार रोहित शर्माचे पुनरागमन झाले आहे. तर काही युवा खेळाडू देखील आहेत ज्यांना या मालिकेत पदार्पण करण्याची संधी दिली जाऊ शकते.
या मालिकेसाठी भारतीय संघात आवेश खान, रवी बिश्नोई आणि दीपक हुड्डा या युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे त्यांना ही संधी देण्यात आली आहे. या मालिकेत आर अश्विनला संधी देण्यात आली नाहीये. तर कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांच्या जोडीला पुनरागमन करण्याची संधी देण्यात आली आहे. हे दोघेही खूप दिवसांनंतर एकत्र खेळताना दिसून येणार आहेत. तसेच २१ वर्षीय युवा फिरकीपटू रवी बिश्नोईलादेखील प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले जाऊ शकते.
रवी बिश्नोईच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने आतापर्यंत १७ लिस्ट ए सामन्यात २४ गडी बाद केले आहेत. तर ४२ टी२० सामन्यात ४९ गडी बाद केले आहेत. तसेच त्याने आयपीएल स्पर्धेत आपल्या फिरकीच्या गोलंदाजीच्या जोरावर अनेक दिग्गज फलंदाजांना अडचणीत टाकले आहे.
या वेगवान गोलंदाजाला मिळू शकते संधी
वेस्ट इंडीज विरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी संघातील वरिष्ठ गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजी आक्रमणाची जबाबदारी कोणावर असणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे. यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहे. परंतु या सर्वांमध्ये असा एक गोलंदाज आहे, जो सुरुवातीच्या आणि अंतिम षटकांमध्ये चांगली गोलंदाजी करू शकतो. तो गोलंदाज म्हणजे दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व केलेला गोलंदाज आवेश खान. आवेश खानने आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता दिग्गजांच्या अनुपस्थितीत त्याला पदार्पण करण्याची सुवर्णसंधी आहे.
असा आहे वेस्ट इंडीज विरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, रिषभ पंत (यष्टिरक्षक), दीपक चाहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि आवेश खान.
असा आहे टी२० मालिकेसाठी भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टिरक्षक), व्यंकटेश अय्यर, दीपक चाहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान आणि हर्षल पटेल.
महत्वाच्या बातम्या :
आगामी विश्वचषकापूर्वी बांगलादेशला मोठा झटका, महत्वाच्या फलंदाजाची टी२० मधून ६ महिन्यांसाठी विश्रांती
कर्णधार रोहितला थोडाही नाही आवडला ‘हा’ खेळाडू! फक्त २ सामने खेळवून केली वनडेतून हाकालपट्टी
हे नक्की पाहा: