भारतीय संघाचा दिग्गज अष्टपैलू हार्दिक पंड्या मागचे दोन्ही आयपीएल हंगामांमध्ये अंतिम सामना खेळला आहे. दुखापतीनंतर क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन त्याच्यासाठी नक्कीच सोपे नव्हते. असे असले तरी, पंड्याने धीर न सोडता पुनरागमन केले आणि संघासाठी महत्वाची भूमिका पार पाडू लागला. दुखापतीनंतर वनडे आणि टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी खेळलेला पंड्या अद्याप कसोटी फॉरमॅटमध्ये खेळू शकला नाहीये. मात्र, आता भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी त्याच्या कसोटी कारकिर्दीबद्दल एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
भारतीय संघाची नुकतीच वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी निवड झाली. यातील कसोटी संघात स्थान बनवण्यात हार्दिक पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्याचा कसोटी क्रिकेटच्या भविष्याबाबत वक्तव्य करताना शास्त्री म्हणाले,
“मी यापूर्वी म्हटलो आहे की वनडे विश्वचषानंतर हार्दिकने भारताच्या वनडे व टी20 संघाची धुरा सांभाळावी. मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची त्याची शक्यता कमी आहे. मी त्याला दुखापतीच्या आधी आणि दुखापतीनंतर जितका पाहिला त्यावरून म्हणू शकतो की, त्याचे शरीर आता कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी त्याला साथ देणार नाही. खरंतर ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे.”
हार्दिक मागील पाच वर्षापासून कसोटी क्रिकेट खेळलेला नाही. मात्र तो वनडे व टी20 संघाचा नियमित सदस्य आहे. त्याने सप्टेंबर 2018 मध्ये आपला अखेरचा कसोटी सामना खेळला होता. हार्दिकने 2017 मध्ये कसोटी पदार्पण केल्यानंतर भारतासाठी 11 कसोटी सामने खेळले. यादरम्यान त्याने 532 धावा व 17 बळी मिळवले होते. सध्या तो भारताच्या वनडे व टी20 संघाचा उपकर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने आयपीएल अंतिम फेरीत धडक मारली होती.
(Ravi Shastri Said Hardik Pandya Can’t Play Test For India Anymore)
महत्वाच्या बातम्या-
शास्त्री गुरुजींनी सुचवले टीम इंडियाचे नवे कॉम्बिनेशन! म्हणाले, “ते दोन जण संघात हवेत”
यशस्वीचा राजस्थान रॉयल्सविषयी मोठा खुलासा! म्हणाला, “त्यांनी फक्त मला संधीच दिली नाही तर,…”