---Advertisement---

दिनेश कार्तिकसारख्या तगड्या खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवत शास्त्रींनी निवडली टी२० प्लेइंग ११, टाका नजर

Dinesh-Karthik
---Advertisement---

भारताविरुद्ध ५ टी२० सामने खेळण्यासाठी सध्या दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात आला आहे. ९ जूनपासून या मालिकेला सरुवात होणार आहे. या मालिकेसाठी संघ निवडत असताना भारताचा कर्णधार रोहित शर्मा, फलंदाज विराट कोहलीसह वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांना विश्रांती देण्यात आली होती. अशातच आता भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी या मालिकेसाठीचा ११ खेळाडूंचा संघ निवडला आहे.

स्टार स्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमात भारतीय संघाची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठीचा रणनिती ठरवत असताना रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी हा संघ निवडला आहे. यावेळी त्यांनी संघात केएल राहुल आणि ऋतुराज गायकवाड यांची सलामीवीर म्हणून निवड केली आहे. शास्त्री म्हणाले की, “आता ईशानला सलामीवीर म्हणून विश्रांती देण्याची वेळ आली आहे. आम्ही तिसऱ्या क्रमांकावर प्रयत्न करू शकतो.” याशिवाय शास्त्रींनी चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर आणि पाचव्या क्रमांकावर यष्टीरक्षक/फलंदाज म्हणून रिषभ पंतची निवड केली आहे. आयपीएल २०२२मध्ये अप्रतिम खेळ करणाऱ्या दिनेश कार्तिकला शास्त्रींनी आपल्या संघात स्थान दिलेले नाही. याशिवाय व्यंकटेश अय्यर देखील रवी शास्त्री यांच्या पसंतीस उतरला नाही. त्याचबरोबर हार्दिक पंड्याला संघात सहाव्या क्रमांकावर ठेवण्यात आले आहे.

शिवाय शास्त्रींनी उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग यापैकी एकाला प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेवण्याचा सल्ला दिला आहे. यापुढे ते म्हणाले की, “खेळपट्टी कशी असेल हे पाहिल्यानंतर तुम्ही उमरान आणि अर्शदीप या दोघांना प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेवू शकता.” त्याचबरोबर भुवनेश्नवर कुमार आठव्या क्रमांकावर शिवाय युझवेंद्र चहलला फिरकीपटू म्हणून संघात स्थान दिले आहे आणि हर्षल पटेलला देखील संघाचा भाग बनवले आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रवी शास्त्रींनी निवडलेला टी२० संघ
केएल राहुल (कर्णधार), रुतुराज गायकवाड, ईशान किशन, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग/उमरान मलिक, हर्षल पटेल

व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

मुलगा झोरावरच्या आठवणीने व्याकूळ झालेला ‘गब्बर’, भेटल्यानंतर कडकडून मारली मिठी, चाहतेही झाले व्यक्त

नशीब असावं तर असं! एकही आयपीएल सामना न खेळूनही ‘या’ ३ खेळाडूंनी कमावले कोट्यवधी

देर आये दुरुस्त आये! चौदा वर्षांनंतर भज्जीला चुकीची जाणीव, श्रीसंतसोबतच्या ‘थप्पड कांड’वर दिली प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---