क्रिकेट विश्वात रोज नवनवीन घटना घडत असतात. मागील काही वर्षापूर्वी कसोटी क्रिकेटचे भवितव्य धोक्यात आले होते. यामुळे काही खेळाडूंनी कसोटीला चांगलेच ट्रेंड करत त्याचे महत्व पटवून दिले होते. त्यातच आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कसोटी अजिंक्यपद स्पर्धा सुरू केल्याने चाहत्यांमध्ये भर पडत आहे. मात्र भारताच्या माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींनी कसोटीला तीन किंवा चार संघांपर्यंतच मर्यादित ठेवा, असे धक्कादायक विधान केले. त्यांच्या या विधानावर भारताच्या अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने मोठी प्रतिक्रीया दिली आहे.
भारताचे माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी कसोटी क्रिकेट अधिक रोमांचक व्हावे यासाठी ते कमी संघांमध्ये खेळले जावे, सल्ला दिला होता. मात्र रविचंद्रन अश्विन (Ravuchandra Ashwin) त्यांच्या या विचाराशी सहमत नाही. त्याचे कसोटी क्रिकेटबाबत वेगळा विचार आहे. त्याने आपल्या युट्युब चॅनलमध्ये म्हटले, नुकतेच रवी यांनी कसोटी क्रिकेट तीन किंवा चार संघांतच खेळले जावे असे म्हटले आहे. मात्र जर असे झाले तर आयर्लंडसारख्या संघांना खेळण्याची संधीच मिळणार नाही.
कसोटी आणि टी२० एकमेकांशी संबधित
“कसोटी आणि टी२०मध्ये एक नाते आहे असून जो संघ प्रथम श्रेणीचे उत्तोमत्तम खेळाडू, संघ तयार करतो तोच टी२०मध्ये चांगले खेळाडू देऊ शकतो,” असे पुढे अश्विनने म्हटले आहे.
अश्विन म्हणाला, “तुम्ही मला टी२० क्रिकेट आणि कसोटी यांच्यात काय संबंध आहे असे विचारू शकता. जेव्हा तुम्ही कसोटी क्रिकेट खेळता तेव्हा तुमची प्रथम श्रेणी सुधारणार आहे. जे प्रथम श्रेणीत चांगले खेळतात त्यांना सर्वाधिक संधी मिळतात. तसेच जो खेळाडू प्रथम श्रेणी चांगला खेळेल तो त्याच्याप्रमाणे टी२०मध्ये त्याचा खेळ बदलू शकतो.”
यावेळी अश्विनने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे उदाहरण दिले आहे. त्याने म्हटले, “तुम्ही कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या पहिल्या तीन संघाकडे पाहा. त्यांची कसोटीतील कामगिरी अफाट आहे. यामध्ये भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया मजबूत संघ आहेत. त्याचबरोबर या संघांची प्रथम श्रेणीची रचना मजबूत आहे.”
विदेशी खेळाडूंकडे रणजी खेळण्याची संधी
भारताचे अनेक खेळाडू इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळतात. त्यात चेतेश्वर पुजारा, नवदीप सैनी आणि वॉशिंगटन सुंदर इत्यांदी खेळाडूंचा समावेश आहे. याबाबतही अश्विनने आपले मत व्यक्त केले आहे. त्याने म्हटले, भारताची प्रथम श्रेणी आणखी मजबूत होईल, कारण नवदीप सैनी आणि वॉशिंगटन सुंदर काउंटी क्रिकेट खेळत आहेत. त्यामुळे विदेशी खेळाडूंकडेही रणजी ट्रॉफी खेळण्याची संधी आहे.
“आपण प्रथम श्रेणीला कसे ताकदवान बनवू शकतो, जेव्हा तो संघ अधिक कसोटी सामने खेळेल तेव्हाच. मी सध्या वेस्ट इंडिजमध्ये असून तेथे प्रथम श्रेणीचे सामने फार कमी होत आहेत, कारण इथे निरनिराळ्या टी२० लीगने त्याची जागा घेतली आहे,”असे म्हणत अश्विनने वेस्ट इंडिजमधील प्रथम श्रेेणीच्या अवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बांग्लादेशच्या दिग्गज खेळाडूने केली टी-२० क्रिकेटवर टीका! म्हणाला, ‘हा फॉरमॅट…’
दीपक हुड्डा ‘या’ तिघांची वाढवतोय चिंता! भविष्यात बळकवू शकतो संघातील महत्वाचे स्थान
‘रोहितने पहिलं फिटनेसवर लक्ष द्यावं,’ पाकिस्तानच्या माजी खेळाडूने दिला सल्ला