भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू रविंद्र जडेजा राजकोट कसोटीत मॅच विनर ठरला. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना राजोकोटमध्ये खेळला गेला. या सामन्यात रविंद्र जडेजा याने भारतासाठी पहिल्या डावात शतक केले, तर दुसऱ्या डावात पाच विकेट्स घेत इंग्लंडचे कंबरडे मोडले. यासाठी त्याला सामनावीर पुरस्कार दिला गेला. अष्टपैलू आणि त्याची पत्नी रिवाबा मागच्या काही दिवसांमध्ये चांगलेच चर्चेत राहिले आहेत. अशातच रविवारी (18 फेब्रुवारी) सामनावीर पुरस्कार जिंकल्यानंतर जडेजाचे वक्तव्य चर्चेचा विषय बनले.
राजकोट कसोटी (Rajkot Test) सामन्यात भारतासाठी कर्णधार रोहित शर्मा, रविंद्र जडेजा, यशस्वी जयस्वाल, सरफराज खान, आणि मोहम्मद सिराज या खेळाडूंना अप्रतिम प्रदर्शन केले. पण अखेर सामनावीर पुरस्काराचा मानकरी जडेजाच ठरला. अष्टपैलूने भारतासाठी राजकोट कसोटीच्या पहिल्या आणि दुसऱ्या डावात निर्णायक भूमिका पार पाडली. काही दिवसांपूर्वीच जडेजाचे वडील अनिरुद्ध यांनी एका मुलाखतीत आपला मुलगा आणि सून रिवाबा यांच्याबाबत मोठे विधान केले होते. अनिरुद्ध यांच्या मते त्यांचा मुलगा रविंद्र पत्नीच्या प्रभावामुळे पूर्णपणे बदलाल आहे. ते मुलाकडून एक रुपयाची मदत घेत नसल्याचेही जडेजाच्या वडिलांनी स्पष्ट केले होते.
भारतीय संघाचा दिग्गज क्रिकेटपटू जडेजासाठी वडिलांनी केलेले हे विधान नक्कीच शरमेची बाब ठरले. अष्टपैलूला सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून वडिलांच्या विधानावर स्पष्टीकरण देखील द्यावे लागले. पण चर्चा अद्याप धांबल्याचे दिसत नाहीत. रविवारी सामनावीर ठरल्यानंतर जडेजाने हा पुरस्कार पत्नी रिवाबाला समर्पित केला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर जडेजा म्हणाला, “एकाच कसोटी सामन्यात शतक आणि पाच विकेट्स घेणं खरोखर खास प्रदर्शन आहे. आपल्या होम ग्राऊंडवर कसोटी सामना जिंकणे हा अनुभव देखील खास होता. मी हा पुरस्कार माझ्या पत्नीला समर्पित करतो. तिने माझ्या मागे मानसिक दृष्ट्या खूप मेहनत घेतली आहे. सोबत तिच्यामुळे मला खूप आत्मविश्वास देखील मिळाला आहे.”
Presenting – 𝗔 𝗩𝗶𝗰𝘁𝗼𝗿𝘆 𝗦𝘆𝗺𝗽𝗵𝗼𝗻𝘆
RAW emotions post #TeamIndia‘s emphatic win in Rajkot 👏 👏
WATCH 🎥🔽 #INDvENG | @IDFCFIRSTBankhttps://t.co/fSfLs8uMA3
— BCCI (@BCCI) February 19, 2024
दरम्यान इंग्लंड संघाला विजयासाठी शेवटच्या डावात 557 धावांचे लक्ष्य मिळाले होते. प्रत्युत्तरात पाहुणा संघ मात्र 39.4 षटकांमध्ये 122 धावांवर सर्वबाद झाला. भारताने पहिल्या डावात 445 धावा केल्या होत्या. तर दुसरा डाव 4 बाद 430 धावांवर घोषित केला होता. इंग्लंड संघाचा पहिला डाव 319 धावांर गुंडाळला गेला आणि भारतीय संघ तेव्हापासून सामन्यात पुढे होता. पहिल्या डावात इंग्लंडसाठी बेन डकेट याने 153 धावांची वादळी खेळी केली. पण दुसऱ्या डावात त्यांचा एकही फलंदाज अर्धशतकापर्यंत मजल मारू शकला नाही. (Ravindra Jadeja credits wife Rivaba for Man of the Match award in Rajkot Test)
महत्वाच्या बातम्या –
तर ‘असा’ आहे ईशानचा प्लॅन, रणजी ट्रॉफीत न खेळण्याचे खरे कारण अखेर समोर, आता पुढे काय?
IND vs ENG : भारताला आता ‘या’ दिग्गजाची कमी जाणवणार नाही! जयस्वालविषयी माजी कर्णधाराचे मोठे विधान