भारताने पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव करून मालिका ३-० ने जिंकली. या मालिकेत भारताने प्रत्येक विभागात चांगली कामगिरी केली. मात्र, काही खेळाडूंच्या फिटनेसमुळे संघ व्यवस्थापनाची चिंता नक्कीच वाढली आहे. त्यातील एक अष्टपैलू रवींद्र जडेजा आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात तो खेळेल अशी अपेक्षा होती मात्र तो उतरू शकला नाही. जडेजाला न खेळवण्याचे कारणही बीसीसीआयने सामन्यापूर्वी स्पष्ट केले.
बीसीसीआयने दिलेल्या अपडेटमध्ये रवींद्र जडेजा अजूनही १०० टक्के तंदुरुस्त नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे तो तिसऱ्या वनडेत निवडीसाठी उपलब्ध नव्हता. वैद्यकीय पथक त्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवून आहे. जडेजाच्या दुखापतीबाबत बीसीसीआयने दिलेल्या अपडेटमुळे २९ जुलैपासून वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू होणाऱ्या ५ टी२० मालिकेतूनही तो बाहेर जाण्याची शक्यता बळावली आहे.
वास्तविक, भारतीय बोर्डाला जडेजाच्या पुनरागमनाची घाई करायची नाही. भारताला ऑगस्टमध्ये आशिया कप खेळायचा आहे. यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी२० आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी२० विश्वचषक होणार आहे. हे पाहता बीसीसीआय जडेजाबाबत कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. जडेजाला सध्या सराव न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कारण यामुळे त्याच्या गुडघ्याची दुखापत वाढण्याची शक्यता आहे.
जडेजाच्या गुडघ्याला दुखापत झाली
तुम्हाला सांगतो, वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे मालिका सुरू होण्यापूर्वी जडेजाच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली होती, ज्यामुळे तो पहिले दोन वनडे खेळू शकला नव्हता. त्याच्या जागी अक्षर पटेलचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आणि त्याने बॉल आणि बॅट या दोन्ही बाबतीत चांगली कामगिरी केली.
दरम्यान, जडेजा अगदी कमी वेळेस दुखापतीच्या कारणामुळे संघाबाहेर राहिला आहे. यंदा वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे मालिकेत जडेजा खेळण्यास उपलब्ध नसल्याने अक्षर पटेलला संघात संधी मिळाली. यावेळई अक्षरने या संधीचे सोनं करत दुसऱ्या वनडेत शानदार अर्धशतक झळकावत भारताला विजय मिळवून दिला. आणि सामनावीर ठरला. त्यामुळे आता संघात जडेजाची जागा घ्यायलाही एक चांगला पर्याय तयार झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कर्णधार ‘गब्बर’ ठरतोय माहीपेक्षाही वरचढं?, केलीये ‘या मोठ्या विक्रमाची बरोबरी
आणखी एका विश्वचषकाचे यजमानपद भुषवण्यासाठी भारत सज्ज, गांगुलींनी सांगितलं ‘कधी होणार वर्ल्डकप?’