जगातील महान खेळाडूंपैकी एक, ‘मिस्टर 360 डिग्री’ म्हणून ओळखला जाणारा एबी डिविलियर्स हा फलंदाजी दरम्यान अपयशाच्या भीतीपोटी बरीच जोखीम घेताना दिसतो. त्याची ही भिती टी-20 स्वरूपातील विविध आव्हानांचा सामना करण्यासाठी त्याला अधिक एकाग्र होण्यास मदत करत असल्याचे त्याचे म्हणणे आहे. आयपीएल 2021 च्या पहिल्याच सामन्यात त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर विजय मिळविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्याने हा स्पर्धात्मक सामना जवळजवळ पाच महिन्यानंतर खेळला होता.
आरसीबीच्या बोल्ड डायरीस कार्यक्रमात, त्याला दरवर्षी तू अशीच खेळी करतो की नाही? असे विचारले असता तो म्हणाला की, “माझ्यासाठी हे नेहमीच आनंददायक असेल असे नाही. परिस्थितीनुसार मी माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो. ही दिसताना एक सामान्य गोष्ट दिसते. पण वास्तवात जेव्हा तुम्ही मधल्या फळीत फलंदाजी करता. तेव्हा प्रत्येक वेळा स्थिती बदलते.”
दक्षिण आफ्रिकेच्या या फलंदाजाने पुढे सांगितले की, “हे सर्व आपले सामंजस्य निर्माण करणे आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवण्यावर अवलंबून असते. परंतु फलंदाजीत येणारे अपयशही नाकारता येत नाही.”
पुढे तो म्हणाला, “असे असले तरीही मला अपयश येणार हे समजल्यानंतर अपयशाची भीती मला नेहमी चेंडूवर अधिक लक्ष केंद्रित करण्यास आणि मुलभूत गोष्टी सुधारण्यास प्रवृत्त करते. त्यामुळे मी चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न करतो. त्यामध्ये पहिल्या 20 चेंडूत चांगली सुरुवात करणे फार महत्त्वाचे आहे.”
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या 37 वर्षीय डिविलियर्सने जेव्हा आपण बऱ्याच कालावधीनंतर उच्चस्तरीय क्रिकेट खेळतो तेव्हा सूर गवसण्यास अधिक वेळ लागत असल्याचे कबूल केले आहे. यंदाच्या आयपीएल मोसमात तो खेळत असलेला आरसीबी संघ चांगली कामगिरी करणार असल्याचाही त्याला विश्वास आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“संघनायकाने माझ्या कुवतीवर विश्वास दाखवला याचा आनंद,” शाहबाज अहमदचे मन जिंकणारे वक्तव्य
विराटसेना पुढे वॉर्नरची पलटण फेल! कर्णधाराने ‘या’ खेळाडूंच्या माथी फोडले पराभवाचे खापर
RCBvSRH: चुरसीच्या लढतीत विराटसेना ठरली यशस्वी, कर्णधाराने ‘या’ २ खेळाडूंना दिले विजयाचे श्रेय