आयपीएल 2024 मध्ये आज (18 मे) राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामना रंगणार आहे. हा या हंगामातील सर्वात हाय वोल्टेज सामना आहे, कारण या सामन्याच्या निकालाद्वारे प्लेऑफसाठी पात्र ठरणारा चाैथा संघ कोणता असेल, हे ठरणार आहे. हा सामना बंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, सामन्यादरम्यान पावसाची शक्यता आहे. जर पावसामुळे संपूर्ण 20 षटकांचा सामना झाला नाही, तर आरसीबीला क्वालिफाय करण्यासाठी काय करावं लागेल, हे आम्ही तुम्हाला या बातमीद्वारे सांगणार आहोत.
संपूर्ण 20 षटकांचा सामना झाला तर, बंगळुरुला प्लेऑफला पात्र ठरण्यासाठी सामना 18 धावांच्या फरकानं किंवा धावांचा 18.1 षटकांत पाठलाग करावा लागेल. तर दुसरीकडे चेन्नईनं हा सामना जिंकला किंवा पावसानं सामना रद्द झाल्यास चेन्नई प्लेऑफसाठी पात्र ठरेल. जरी चेन्नईनं सामना 18 पेक्षा कमी धावांच्या फरकानं गमावला तरी संघ प्लेऑफसाठी पात्र ठरेल.
जर 15 षटकांचा खेळ झाला आणि चेन्नईनं 170 धावा केल्या, तर आरसीबीला 13.1 षटकांत लक्ष्य गाठवं लागेल. तसेच जर आरसीबीनं प्रथम फलंदाजी करताना 200 धावा केल्या, तर त्यांना चेन्नईला 152 धावांवर रोखावं लागेल.
जर 10 षटकांचा खेळ झाला आणि आरसीबीनं प्रथम फलंदाजी करताना 100 धावा केल्या, तर त्यांना चेन्नईला 82 धावांत रोखावं लागेल. तसेच चेन्नईनं प्रथम फलंदाजी करताना 100 धावा केल्या, तर आरसीबीला हे लक्ष्य 8.1 षटकांत गाठावं लागेल.
जर 5 षटकांचा खेळ झाला आणि प्रथम फलंदाजी करताना आरसीबीनं 50 धावा केल्या, त्यांना चेन्नईला 32 धावांत रोखावं लागेल. तसेच चेन्नईनं प्रथम फलंदाजी करताना 50 धावा केल्या, तर आरसीबीला 3.1 षटकांत लक्ष्य गाठावं लागेल.
वरील गणित पाहता, कितीही षटकांचा खेळ झाला आणि कितीही धावा निघाल्या, तरी आरसीबीसाठी एकच सूत्र लागू होतं, ते म्हणजे दिलेलं टार्गेट 11 चेंडू राखून पूर्ण करणे किंवा चेन्नईला 18 पेक्षा अधिक धावांनी पराभूत करणे. विराट कोहलीची टीम असं करण्यात यशस्वी ठरली, तर संघ प्लेऑफसाठी पात्र ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या –
सचिनच्या पोरानं दाखवली ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाला खुन्नस, सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल
2 चेंडूत 2 षटकार खाल्यानंतर ओव्हर पूर्ण न करताच मैदानाबाहेर गेला अर्जुन तेंडुलकर! समोर आलं मोठं कारण